GEETAI APRIL-22-FC Flipbook PDF

GEETAI APRIL-22-FC

90 downloads 100 Views 2MB Size

Recommend Stories


Porque. PDF Created with deskpdf PDF Writer - Trial ::
Porque tu hogar empieza desde adentro. www.avilainteriores.com PDF Created with deskPDF PDF Writer - Trial :: http://www.docudesk.com Avila Interi

EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF
Get Instant Access to eBook Empresas Headhunters Chile PDF at Our Huge Library EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF ==> Download: EMPRESAS HEADHUNTERS CHIL

Story Transcript

04

एप्रिल 2022

श्रेय नामावली श्री. राम बा. जाेगदंड, िवश्वस्त, गितार्इ ह्युमनकार्इं ड डेव्हलपमेंट ट्रस्ट

श्री. चंद्रशेखर हरिभाऊ माेरे,

िवश्वस्त, गितार्इ ह्युमनकार्इं ड डेव्हलपमेंट ट्रस्ट

डाॅ. भरत नथुजी सराेदे, िवश्वस्त, गितार्इ ह्युमनकार्इं ड डेव्हलपमेंट ट्रस्ट

श्री. अविनाश मा. जाेगदंड, मुख्य कार्यकारी अधिकारी, गितार्इ ह्युमनकार्इं ड डेव्हलपमेंट ट्रस्ट

संपादक

डाॅ. माणिकरावजी बा. जाेगदंड

साहाय्यक संपादक

साै. गीतातार्इ घ. जाेगदंड

कार्यकारी संपादक

साै. स्वातीतार्इ अ. लांडकर

संपादन साहाय्य

साै. लक्ष्मी यल्लन्ना

संपादक मंडळ

साै. रागिणीतार्इ रा. वाघ

साै. सुनीतातार्इ संताेषराव जाेगदंड साै. संगीतातार्इ चं. माेरे

गितार्इ परिवार

साै. शांतला हाैदे, प्रििन्सपल, वेदांत पब्लिक स्कूल, पुणे सोनल भाटे एच. अार. रामेलेक्स प्रा. लि. डॉ. रविं द्र एस. करंगामी, सहाय्यक प्राद्यापक, आमखेडा नीतेश हांडे, (एस.अार.ए.), कृषी तंत्रनिकेतन किरण खानबारड, अॅकॅडमिक इनचार्ज, वेदांत पब्लिक स्कूल पाेहा अबाेली हनमंते, क्लार्क , वेदांत पब्लिक स्कूल, कारंजा

प्रशिक्षण | संशाेधन

श्री .रामरावजी वाघ श्री.विक्रम कुमारजी श्री.डॉ. माणिकरावजी जोगदंड श्री.पांडुरग ं भागवनरावजी तावरे श्री. महादेवरवजी भुईभार श्री.सुनील राऊत श्री. रोहिदासजी एच.मोरे श्री. सुभाष केळकर

शिक्षण

सौ .सुनीताताई सं .जोगदं ड सौ .गीताताई घ. जोगदं ड श्री .यदुराज बा दहातोंडे श्री. वि. दा पिंगळे श्री .नामदेवराव तु इंगोले श्री .अमोल दहातोंडे

आरोग्य

श्री .डॉ रवी दे शमुख श्री .डॉ भरत न सरोदे श्री .डॉ संतोष बा जोगदं ड श्री .डॉ दिपक शेळके श्री .डॉ शरदराव दहातोंडे श्री .डॉ हरीश बाहेती

अध्यात्मिक सौ.मनोरमा मा जोगदं ड ब्रम्हकुमारी रुक्मिणी दिदी

सामाजिक

श्री .माधवराव मारशेटवार श्री .राजेश अग्रवाल श्री. राजेश घुगे श्री. माणिकरावजी बा जोगदं ड श्री .राजेश टाले

कृषी

प्रा.विठ्ठलराव गोळे श्री गजानन पाटील श्री .अनिल अडिचवाल श्री. जगदेवरवजी आखाडे श्री .श्रीपतराव बाजड श्री. घनश्याम म.जोगदं ड सौ .अर्चनाताई ध. काळे ब्रम्हकुमारी अरुणा दिदी ब्रम्हकुमारी स्नेहलता दिदी श्री .श्रीकांत अवघडे

मुखपृष्ठ | मांडणी सजावट

मीडिया, पुणे

[email protected]

web : www.geetai.org

कार्यालयीन पत्ता : 81/2, रामेलेक्स हाऊस, दांगट पाटील इं डस्ट्रियल इस्टे ट, एन. डी. ए. राेड, शिवणे, पुणे-411023

Email : [email protected]

०२

आतील पानांत पसायदान समजून घेताना...

:

06

देणे निसर्गाचे कसे वाचवावे?

:

08

दोन सवयी तेवढ्या बदलायच्यात हो...!

:

10

अमृततुल्य पाणी

:

12

पाण्याची किंमत

:

14

पैशासारखे पाणी खर्च करू नका...

:

17

पाणी वाचवले तरच पिढ्या वाचतील

:

20

जल प्रकृति का अनमोल उपहार

:

21

जल संवर्धन अाणि महाराष्ट्र

:

23

जागतिक महिला दिन

:

30

सावित्रीबाई फुले पुण्यतिथी

:

31

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क ’ (यिन) यांची भेट

:

32

होळी उत्साहात साजरी..!/ पुनः नवी सुरुवात...

:

33

होळी रे होळी

:

34

जागतिक चिमणी दिवस

:

35

The Award Ceremony

:

36

“Women are the Architects of Society”

:

37

कृषिपर्यटन शेतकऱ्यांना वरदान

:

38

रोगपरिहारासह वेदनामुक्ती देत सौंदर्यवर्धन करणाऱ्या वनौषधी

:

41

संसाराची राख झालेल्या विधवेला सह्रदयी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात

:

43

शेती करा, मालक बना

:

45

कसे तयार कराल कंपोस्ट खत?

:

47

भारतातलं पहिलं थ्री-डी प्रिंटे ड घर

:

49

०३

संपादकीय ण्याचे दुर्भिक्ष्य हा येणाऱ्या काळात खूप मोठा विषय होणार आहे, यात शंका नाही. कितीतरी प्रकारे पाण्याचे पा महत्त्व सांगितले गेले आहे. पाणी जीवन आहे, वगैरे. पाणी ही काही प्रयोगशाळेत तयार होऊ शकेल, अशी गोष्ट नाही. नाहीतर आतापर्यंत पाण्याचे कारखाने निघाले असते. काही वर्षांनी या देशात पाणी विकत घेतलं जाईल, हे सर्वात आधी ज्याला समजलं, त्या बिस्लेरी कंपनीवाल्याला सलाम केला पाहिजे. नाहीतर हे आज जे संकट उभं ठाकलं आहे, त्याचा अंदाज कधी आला असता आपल्याला? त्याची पाण्याची बाटली बाजारात विक्रीसाठी आली आणि जाणत्या लोकांना भविष्यातील संकटाच्या पाऊलखुणा दिसायला लागल्या. तोपर्यंत आपण निर्धास्त होतो.

०४

आपल्याला वाटायचं, खूप मुबलक पाणी आहे आपल्या सभोवताल. एक काळ होता जेव्हा तहानलेल्याची तहान पाणी देऊन भागवणे, हा धर्म समजला जायचा. पाणी विकायला सुरुवात झाली आणि या धर्माला तडा गेला. आता छोट्या-मोठ्या कंपन्यांच्या दैनिक बैठकांमध्येही विकतचंच पाणी ठेवलं जातं. कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या कॅन येतात. आणि हे चित्र खूप झपाट्यानं बदललं आहे. जयंतीलाल चौहान या उद्योजकानं १९८४ मध्ये बिस्लेरी हा विकतच्या पाण्याचा ब्रॅण्ड आणला. त्याला आता ३८ वर्षे झाली. या इवल्याशा काळात पाण्याची किती मोठं दुर्भिक्ष्य निर्माण झालंय बघा. आज ना जमिनीत पाणी आहे, ना आकाशात. ऊसाची शेती, अगडबंब कारखाने कारखाने, गगनचुंबी बांधकामे, बेकायदा खोदलेल्या बोरवेल इत्यादींच्या माध्यमातून इतका बेसुमार पाण्याचा उपसा होत आहे की, जमिनीतील पाणी पातळी तळाला लागली आहे. वर आकाशातून कोसळणारे पर्जन्यमानही रुसून बसले आहे. कुठे अतिवृष्टी तर कुठे कोरडा दुष्काळ असे पर्जन्याचे अत्यंत असमान वर्तन बघायला मिळत आहे. तुम्ही म्हणाल, पाणी नाही असं कसं म्हणता? इतके समुद्र दिसतात. हिमटेकड्या आहेत. नद्या आहेत. त्यात पाणी आहेच की. आणि पृथ्वीचा सत्तर टक्के भाग तर पाण्यानेच व्यापला आहे की. खरं आहे. आहे पाणी समुद्रात. पण त्यानं तुमची तहान भागेल? असं किती समुद्राचं पाणी आपण पिण्यायोग्य करू शकणार आहोत? त्याचा उपयोग शेतीला होईल का? नद्यांची अवस्था किती वाईट आहे? नद्या इतक्या गलिच्छ झाल्या आहेत की गुरं-ढोरं धुवायचीही इच्छा होऊ नये. मग पिण्यासाठी वापर करायची बात तर दूरचीच. जगात, आपल्या आजूबाजूला पाणी आहे, पण ते आपल्या उपयोगाचं नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्याला पिण्यायोग्य, शेतीयोग्य आणि आपल्या वापरायोग्य पाणी हवे आहे आणि ते आपल्याला नैसर्गिक उपायांनीच मिळवावे लागेल, हेही समजून घ्यावे लागेल. आता उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. पाण्याची टंचाईही जाणवू लागली आहे. पाणी नाही म्हणून औष्णिक वीज निर्मिती थांबली आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्याच्या या अंकाची थिम ‘पाणी वाचवा’ अशी घेतली आहे. आपल्याला आवडेल, अशी खात्री आहे. - कार्यकारी संपादक.

०५

अध्यात्म

कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाची सांगता श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने होते. संप्रदायातील बहुतांश जनसमुदायात पसायदान तोंडपाठ आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रार्थनेची (पसायदानाची) लोकप्रियता एवढी आहे, की लहान मुले, वयोवृद्ध, शाळेतील शिक्षक, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, स्त्री-पुरुष अगदी सर्वांना पसायदान सुपरिचित आहे. एवढेच नव्हे, तर रशियातील मास्को युनिव्हर्सिटीमध्ये दररोज प्रार्थना म्हणून पसायदान स्वीकारले आहे. या पसायदानाचा अर्थ सर्वश्रुत व्हावा, सर्वसामान्य जनतेपर्यंत त्याचे एकप्रकारे शास्त्रीय व मार्मिक दृष्टीने बिनचूक विवेचन व्हावे, म्हणून या पसायदानाच्या चिंतन मालिकेची प्रवृत्ती असावी, असे माझे मत आहे.

ह.भ.प. पंकज महाराज पवार, आळं दी देवाची, पुणे.

पसायदान

समजून घेताना... ०६

जे खळांची व्यंकटी सांडो | तया सतकर्मी रती वाढो| भुता परस्परे जडो| मैत्र जिवांचे|| संत ज्ञानदेवानं लिखित असलेल्या पसायदानातील दुसऱ्या ओळीतील ही प्रथम मागणी या एकाच ओवी मध्ये माउलीने तीन मागण्या मागितल्या आहेत. खरे पुरुषांच्या विकृत स्वभाव नष्ट होवो,तसेच त्याच्या अंतकरणातून सत्कर्म करण्याची प्रवृत्ती वाढो,आणि प्राणिमात्र जेव्हा एकमेकांना भेटतील तेव्हा त्यांच्या भेटीमध्ये मैत्रीचे भाव निर्माण होवो... तर व्यंकटी सांडो म्हणजे त्याच्या अंतःकरणातील कुशिलपणा, दुष्टबुद्धी,वाईट वागण्याची प्रवृत्ती ,वक्रता,वाकडेपणा विकृतपणा नष्ट होवो.त्यांनी अपप्रवृत्ती सोडून द्यावी,कारण समाजामध्ये किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात असो ते त्यांच्या स्वार्थासाठी संत्रस्त करतात.म्हणून माऊली अमृतदृष्टीने दृष्टांचा दुष्टपणा निवृत्त होवो ही मागणी करतात. वास्तविक माउलींनी या समाजातील खल पुरुषांच्या जास्त उपडन झाला.त्यांना आणि त्यांच्या आई वडिलांना सुमारे 20 वर्षापर्यंत खलप्रवृत्तीच्या लोकांनी त्यांचा सातत्याने अमानुष्यपणे छळ केला. अंत्योदा त्यांना देह त्याग करावा लागला.माऊलीच्या त्यांच्या या छळाबद्दल कोठेही उल्लेख केला नाही. खल शब्दाचा अर्थ आहे स्वत : चे स्वार्थ न साधता विनाकारण दुसऱ्याला पीडा देणारा आणि दुष्ट

श्री

शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसर्याला पीडा देणारा. माऊलीचा अवतार हा केवळ जग उद्धारासाठी अवतरल्यामुळे माउली खळे असे शब्दाचा प्रयोग करीत नाहीत. खल हा दुसऱ्याचे वाईट करण्याविषयी सहस्रबाहु असतो. दुसऱ्यांचे दोष बघण्याविषयी सहस्नेहभाव असतो. दुसऱ्याचा नाश होण्यात तो अग्मी असतो.जगात अनेक उत्पात घडवून आणण्यात धूमकेतू असतो. आपल्या संगतीने इतरांना बिघडवून टाकतो.आपल्या आचार विचाराची दुरुस्ती केल्याशिवाय शुद्धीकरण होत नाही. म्हणूनतर माउलीने पहिल्या ओळीत प्रार्थना केली की जे ||खळांची व्यंकटी सांडो|| जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात किंवा किंबहूना सर्वसुखी -या दोन ओळयांमधून ज्याला जे हवय ते त्याला प्राप्त होवो सर्वांनी सर्व सुखाने पूर्ण न्हावे,अशी माऊलींची प्रार्थना आहे.परंतु यावर शंका उपस्थित होतात. एखाद्या दुष्टाला,सजजनाला पीडा देण्याची उच्च असते ते करण्यातच त्याला त्याला सौख्य वाटते. अशाप्रकारची इच्छा पूर्ण व्हावी आणि त्यांना सुख प्राप्त व्हावे. या शंकेक्सय निराकरणार्थ ही पहिली प्रार्थना त्यांच्याबद्दल सुडबुद्धीतर नाहीच,पण त्यांच्या विषयी जास्त तरबेज दिसतो, त्याचे उदाहरण म्हणजे हेच ते पसायदानचे प्रथम प्रार्थना होय.माऊलीच्या महत्वाचे हीच ती उत्तम असलेला हृदयाची साक्ष होय.आई ज्या प्रमाणे हुशार मुलांची काळजी न कार्य दुर्बुद्धी मुलांची काळजी जास्त करतात तसेच माऊली खळजनांचे लवकर काळजी करते ही प्रार्थना करतात.यामुळेच तर 22 वर्षांचे सोनेरी माऊली होऊ शकली. जगातील सर्व पुरुषांमध्ये आमूलाग्र बदल व्हायची अपेक्षा करतात.त्याच्या अंतःकरणात दुष्टपणा आहे त्याच्या भगवंतांनी असुरी लोक म्हंटले आहे. माउलींनी कौरावांनाही खळे शब्दांचा प्रयोग केला आहे.सुईच्या टोका एवढिहीही जमीन मिळणार नाही हेच त्या कौरवांच्या वक्र बुद्धीचे सत्यक दर्शन. (क्रमश:) ०७

वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण, त्याहून झपाट्याने नष्ट होणारी जंगले, वने, शेती, मोठमोठाल्या कारखान्यांच्या प्रदूषणामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व त्यामुळे बदलणारे निसर्गचक्र या सगळ्याचा परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर होतोय असे दिसते. अविनाश मा. जोगदंड,

मुख्य कार्यकारी अधिकारी, गिताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे.

देणे

निसर्गाचे कसे

वाचवावे

०८

न वॉटर हार्वेस्टिंग करून वाया जाणाऱ्या अक्षरश: लाखो लिटर्स पाण्याची आपण बचत करू शकतो. हेच पाणी नंतर पाणीटंचाईच्या काळात, उन्हाळ्यात वगरे आपणास उपयोगी ठरू शकते. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे वाचवलेले पाणी, पिण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी - जसे घरामध्ये इतर वापरासाठी, बागेसाठी, शेतीसाठी, औद्योगिक वापरासाठी उपयोगी पडते. पाणी म्हणजेच जीवन याबद्दल दुमत नसावे! ‘पानी पानी रे’ किंवा ‘ पानी रे पानी तेरा रंग कैसा..’ अशा गाण्यांच्या ओळी गुणगुणताना आपला मूड अगदी छान असतो! पण हेच पाणी मिळणे जेव्हा दुर्लभ होते; तेव्हा वरील गाण्याचा अर्थ अगदी वेगळाच होऊन जातो व पाणी वेगळ्या अर्थाने आपला ‘रंग’ दाखवू लागते! वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण, त्याहून झपाट्याने नष्ट होणारी जंगले, वने, शेती, मोठमोठाल्या कारखान्यांच्या प्रदूषणामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व त्यामुळे बदलणारे निसर्गचक्र या सगळ्याचा परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर होतोय असे दिसते. अर्थात, आर्थिक व सामाजिक प्रगती करताना त्याची काही प्रमाणात किंमतही चुकवावी लागतेच! त्यामुळे ही प्रगती साधताना, आपल्याकडून जलसंवर्धन कसे साधता येईल याचा विचार व्हायला हवा, कृती व्हायला हवी. पाणी काही आपण तयार करू शकत नाही, पण उपलब्ध असलेले पाणी काळजीपूर्वक वापरणे, वापरलेल्या पाण्याचा शक्य तितका पुनर्वापर करणे, पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा वापर करणे, या व अन्य मार्गानी पाणी बचत व संवर्धन करता येणे शक्य आहे. आपण सर्वानी आपल्या मनाशी शांतपणे विचार केला तर आपल्यालाच आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या बचतीचे अनेक मार्ग सापडतील. मुख्यत्वे शहरी व निमशहरी भागात जलसंवर्धन कसे करता येईल याचा. जलसंवर्धनाचा सर्वात सोपा पण अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे पावसाचे पाणी साठवणे/जिरवणे म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग हा होय. पाऊस पडताना तो इमारतींच्या/घरांच्या छतांवर पडून त्याचे पाणी रस्त्यावरून वाहून जाते. पुढे ते पाणी कोठेतरी नाल्याला वगैरे जाऊन मिळते. हेच छतावर पडणारे पाणी, शास्त्रीय पद्धतीने पन्हाळी, पाइप इ.च्या साहाय्याने गोळा करता येते. हे छतावरून गोळा केलेले पाणी योग्य त्या फिल्टरच्या साहाय्याने गाळून ते जमिनीखाली अथवा जमिनीवर बांधलेल्या टाक्यांमध्ये साठवता येते. तसेच, ज्या ठिकाणी कूपनलिका अथवा विहिरी आहेत, अशा ठिकाणी हे पाणी पाइपच्या साहाय्याने सोडून त्याची साठवणूक करता येते. या सर्व प्रक्रियेला ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’

रे

असे म्हणतात. महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपूर्वी महानगरपालिकांमध्ये ठराविक बांधकामासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे. पण खरे तर या गोष्टीचा इतका उपयोग होतो की सगळीकडेच याचा वापर केला गेला पाहिजे. अर्थात, ते करताना त्यातील माहीतगारांची, तज्ज्ञांची मदत/मार्गदर्शन घेतले पाहिजे. याचे कारण सर्वच ठिकाणी पडणाऱ्या पावसाचे प्रमाण हे सारखे नसते. तसेच सर्व ठिकाणची भौगोलिक परिस्थिती/ जमिनीची रचनाही वेगवेगळी असते. त्यामुळे पुण्यामधील रेन वॉटर हार्वेस्टिंग हे मुंबईपेक्षा वेगळे असलेच पाहिजे. मुंबईमध्ये भौगोलिक परिस्थितीमुळे व अतिप्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करताना गोळा केलेले सर्वच पाणी कूपनलिकेमध्ये सोडणे शक्य नसते. त्यामुळे ते पाणी जमिनीवर अथवा जमिनीखाली टाकी बांधून त्यामध्ये सोडणे जास्त सोयीस्कर ठरते. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे सोपे व साधे तंत्रज्ञान वापरून राजस्थान तसेच गुजरातमधील कित्येक दुष्काळप्रवण गावे आज पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. पाणी बचतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या व्यतिरिक्त वापर झाल्यावर सोडून/ टाकून दिलेले पाणी जसे सांडपाणी, स्युवेज इ.वर प्रक्रिया करून त्यामधील जवळजवळ ८० ते ९० टक्के पाण्याचा पुनर्वापर करता येतो. याकरिता लागणारी साधनसामग्री अथवा प्लांट हा पाण्याची गुणवत्ता व त्याचे प्रमाण यावर आधारित असतो. चिंचवड येथील एका शाळेत वर्गाबाहेर रिकामे ड्रम ठेवलेले असतात. प्रत्येक विद्यार्थी शाळा संपल्यावर घरी जाताना आपल्या वॉटर बॅगमधील उरलेले पाणी त्या ड्रममध्ये टाकतो. हे पाणी नंतर शाळेच्या आवारातील झाडांना, बागेला टाकण्यात येते. जवळचेच उदाहरण सांगायचे झाले तर अापल्या वेदांत पब्लिक स्कुल, पाेहा येथे शाळा सुटल्यानंतर अापल्या पाण्याच्या बाटलीमधील उरलेले पाणी विद्यार्थी िनयमीपणे शाळेच्या अावारातील त्यांनी लावलेल्या फुले व फळझाडांना टाकतात. किती साधी पण महत्त्वपूर्ण गोष्ट! यामुळे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पाणी बचतीचे व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व समजू लागते! अशा पध्दतीचा उपक्रम प्रत्येक शाळेने करावा, असे अावाहन ‘गिताई’ परिवार नम्रपणे करू इच्छिते. ०९

आपण पाणी फक्त पिण्यासाठी वापरत नाही तर परिसर, शरीर स्वच्छ करण्यापासून तर अन्नापर्यंत सर्व काही तयार करण्यासाठी त्याचा वापर करतो. पीक उत्पादन, पशुधन आणि जैवइंधनासह इतर अनेक गोष्टींकरिता आपण उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर करतो. हा उपयोग आवश्यक जरी असला तरीही त्याचं योग्य ते नियोजन करणं ही आज काळाची गरज बनली आहे. या सगळ्याकरिता आपल्याला फार काही जगावेगळं करायची गरज नाही. गरज आहे ती आपल्या दैनंदिन सवयी बदलण्याची.

निकिता पदवाड, सुस, पुणे.

दोन सवयी तेवढ्या

बदलायच्यात हो...! १०

वसंत गेला ग्रीष्म आला, वर्षाचा तो वेद लागला शरदानंतर हेमंतानी शिशिराचा आलेख आखला! कापाठोपाठ येणाऱ्या ह्या ऋतूंमध्ये आणि त्यांच्या नावांमध्ये त्यांचं अगदी यथोचित महत्व दडलंय. हिरिरीनं येणाऱ्या ह्या ऋतुचक्रामध्ये सध्या आपण अनुभवतोय तो कडाडणारा ग्रीष्म. गेल्या काही वर्षांत उन्हाची ही दाहकता एवढी वाढलीय की प्रत्येक सजीव ह्यात पोळून निघेल आणि ह्याचं कारण हे सर्वश्रुत आहे “ग्लोबल वॉर्मिंग” (Climate change refers to long-term shifts in temperatures and weather patterns.) सहज सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मानवी कृत्यांमुळे (कारण पशु असले उद्योग करतच नाहीत) जसे की जादा मासेमारी, औद्योगिकीकरण, वाढलेली वाहतूक आणि वाहने, तेल ड्रिलिंग, पॉवर प्लांट्स, कचरा, इत्यादी कारणांमुळे विकासाच्या नावाखाली होणारा पृथ्वीचा ऱ्हास हा आपणच आपल्याला आणि येणाऱ्या पिढ्यांना दिलेला ताण आहे. पृथ्वीच्या गर्भामध्ये सजीवाचे सृजन झाले. पशु, पक्षी अन् प्राण्यांसाठी त्या भूमातेने जीवन दिले. पशु, पक्षी, प्राणी आणि मानव ह्या सगळ्यांना जगण्यासाठी अत्यावश्यक असा घटक म्हणजे “पाणी” होय. ते आज आपल्याला विकत घ्यावं लागतंय. का? ह्याचा तर विचार करावाच लागणार आहे आणि त्याहीपेक्षा हे जीवन साठवायचं कसं, रुजवायचं कसं आणि मुख्यतः त्याचं महत्व जाणून ते वापरायचं कसं हे समजणं जास्त आवश्यक आहे. आज जगातील ९७.५% पाणी समुद्र आणि महासागरांमध्ये आहे, जे की मानवी वापरासाठी उपयुक्त नाही. उर्वरित २.५% पैकी बहुतेक हिमालयीन प्रदेशात बर्फ रूपात आहे. म्हणून आपण आज अगदीच अल्प प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून आहोत. पण आपण पाणी फक्त पिण्यासाठी वापरत नाही तर परिसर, शरीर स्वच्छ करण्यापासून तर अन्नापर्यंत सर्व काही तयार करण्यासाठी त्याचा वापर करतो. पीक उत्पादन, पशुधन आणि जैवइंधनासह इतर अनेक गोष्टींकरिता आपण उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर करतो. हा उपयोग आवश्यक जरी असला तरीही त्याचं योग्य ते नियोजन करणं ही आज काळाची गरज बनली आहे.



या सगळ्याकरिता आपल्याला फार काही जगावेगळं करायची गरज नाही. गरज आहे ती आपल्या दैनंदिन सवयी बदलण्याची. उदाहरणार्थ... १. भांडी धुताना, अंघोळ करताना होणारा पाण्याचा अपव्यय टाळा. २. सर्वानुमते “वॉटर रिसायकलिंग” समजून घेऊन अमलात आणणे. ३. सार्वजनिक संस्थांमध्ये वॉटर रिसायकल आणि वॉटर रियूझ अमलात आणणे. ४. वॉटर हार्वेस्टिंग - पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्याचे तंत्र समजून घेऊन अमलात आणणे. ५. दुष्काळ प्रतिरोधक झाडे आणि रोपे लावून त्याभोवती आच्छादनांचा थर लावावा. ६. पाईप्स, होजेस, नळ आणि कपलिंगमधील गळती तपासा. ७. वॉटर प्युरिफायरमधील वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर दैनंदिन कामांसाठी तसेच वृक्ष संवर्धनासाठी करावा.

चला तर मग आपण सर्वांनी एकत्र येऊन पाणीटंचाईची जाणीव जगभर पसरवू या आणि भावी पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी पाण्याचे महत्त्व आणि भूगर्भातील पाण्याच्या संवर्धनासाठी जनजागृती करू या.

पाणी म्हणजे जीवन हेची एक सत्य जाण साऱ्या जीवांचा आधार हेच एक प्रमाण मान... ११

पाण्याचा एक थेंबही खूप मौल्यवान आहे. कसं ते बघामातीमध्ये पडलेले बीज तेव्हाच अंकुरते जेव्हा त्याला पाणी मिळते. ते बीज अंकुरते, फुलते, फळते त्याचे रूपांतर पुढे वृक्षात होते. पाणी जर नसेल तर शेती करता येणार नाही मग खायचे काय? म्हणून पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. पाणी खरेच अमृततुल्य आहे.

निवेदिता राजुस्कर, अकोला

अमृततुल्य पाणी १२

झ्या एका थेंबाने जगतात जीव सारे मी अमृतासमान माझे मूल्य जाना रे’..! तप्त उन्हाच्या झळा जाणवू लागल्या की सजीव सावली आणि पाण्याचा शोध घेतात. पाणी आणि सावलीचा आसरा घेऊन तेथे विसावतात. जीवन जगण्याचा एक मूलभूत घटक म्हणजे पाणी आहे. पाण्याशिवाय मानव मूर्च्छित पडतील. झाडे, वने जळतील. पशु ,पक्षी मरण पावतील. सारी सजीव सृष्टी नष्ट होईल. ही सुंदर वसुंधरा भयाण, भकास भासेल. पाण्याशिवाय जगण्याची कल्पनाच आपण करू शकत नाही. तस पाहिलं तर पाणी अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. सारे सजीव पाण्यावर विसंबून आहेत. त्यामुळे पाण्याची कदर करणे आपले आद्य कर्तव्य आहे. काळाची तशी नितांत गरज आहे. आपल्याकडून पाण्याची नासाडी फार मोठ्या प्रमाणात होत आहे. ती थांबली पाहिजे. गरज असेल तितकाच पाण्याचा वापर करा. जलसाठा मुबलक असला तरी पिण्यायोग्य पाणी फार कमी प्रमाणात आहे. त्यासाठी पाण्याचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेणे अतिआवश्यक आहे. त्यासाठी नदी-नाले, सागर स्वच्छ ठेवावे लागतील. आपण निर्माण केलेला कचरा पाण्यात फेकून न देता त्याची जमिनीवर योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. पाणी प्रदूषण झाल्यामुळे असंख्य सागरी जीव धोक्यात आले आहेत. त्यांचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाणी

मा

दूषित होणार नाही, ही मानवाची नैतिक जबाबदारी आहे. ती ओळखून वागले पाहिजे. पाण्याचा एक थेंबही खूप मौल्यवान आहे. कसं ते बघा- मातीमध्ये पडलेले बीज तेव्हाच अंकुरते जेव्हा त्याला पाणी मिळते. ते बीज अंकुरते, फुलते, फळते त्याचे रूपांतर पुढे वृक्षात होते. पाणी जर नसेल तर शेती करता येणार नाही मग खायचे काय? म्हणून पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. पाणी खरेच अमृततुल्य आहे. जल हेच जीवन आहे. निसर्गाने आपल्याला भरपूर नैसर्गिक संपत्ती दिली आहे. त्याचे जतन आणि संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी पाणी जतन करून ठेवण्याची गरज आहे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या म्हणीप्रमाणे पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे आपण अडवून ठेवू शकतो. पाणी जमिनीत रोखून ठेवण्याचे सर्वात प्रभावी माध्यम वृक्ष आहेत. त्यामुळे झाडांची कत्तल होणार नाही याची दक्षता घेणे आपले काम आहे. तसेच वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे, हेदेखील आपल्या हातात नक्कीच आहे. आजच आपण जागे झालो नाही आणि पाणी हा विषय गंभीरपणे घेतला नाही तर पाणी जमिनीवर कमी राहील आणि डोळ्यात जास्त उरेल. “चल उठ रे मनुष्या जागा हो आता करून ठेव आपल्या भविष्यासाठी जलसाठा”

१३

पाण्याची किंमत त्यालाच अधिक कळू शकते, ज्याला ते उपलब्ध होत नाही. माणसाला खरंच कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली तर त्याची किंमत राहत नाही. आजकाल आपण नेहमी पेपरमध्ये वाचतो. पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन अशा अनेक सामाजिक संघटना काम करताना दिसतात. अनेक पाणी सेवक तयार झाले आहेत. त्यांचं कार्यही जोरदार सुरू आहे. सामाजिक बदलसुद्धा होताना दिसत आहेत. तरीदेखील आपल्याला जागोजागी पाण्याचा अपव्यय होताना दिसतो. ते कुठंतरी थांबले पाहिजे. आणि त्याची सुरुवात आपल्या स्वतःपासून झाली पाहिजे.

गोपाल मुकुंदे, अकोला पोलीस.

पाण्याची किंमत

१४

न्हाळ्याचे दिवस ग्रामीण भाग आणि तोही विदर्भातील, जेथे सिंचनाची पुरेशी व्यवस्था नाही. ना धरण, ना नदीला पाणी. असा तो काळ. गावात पाणी आणावे तरी कुठून हा मोठा पेच असायचा. आमचे गाव म्हणजे खारपाण पट्ट्यातील अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार. आता खारपाण पट्टा म्हणजे काय? तुम्हाला प्रश्न पडला असेल. खारपाण पट्टा म्हणजे जिथं पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षाही खारे आहे, जिथं पक्षीसुद्धा त्याला चोच लावत नाहीत, ज्यामध्ये एवढे क्षार आहेत की, मीठ तयार करून घ्या किंवा चुनखडीपासून चुना तयार करून घ्या. अशी परिस्थिती. म्हणून आमचा भाग खारपाण पट्टा म्हणून प्रसिद्ध! शेती पूर्ण निसर्गाच्या भरवशावर, पाणी आले तर ठीक नाहीतर गेली मेहनत गेली वाया. आमच्या गावाला मोठी बाजारपेठ आहे. तेथे फार मोठा बाजार शुक्रवारी भरतो. आजूबाजूच्या ७२ खेड्यातील लोक बाजारात येत असत. आमच्याकडे त्यांना पिण्यासाठी पाण्याची कोणतीच सुविधा नसायची. आमच्याकडे पाणी म्हटले तर ते जीव शांत करणारे नव्हे, तर जाळणारे असायचे. हॉटेलवालाही फुकटात पाणी द्यायचा नाही. आधी दहा रुपयांचे आलूबोडे घ्या म्हणायचा आणि ते घेतले तरच एक ग्लास पाणी मिळायचे. त्यामुळे जीव शांत होण्याऐवजी पेटूनच अधिक उठायचा. जल ही जीवन है म्हणतात. पाणी पाजणे हा मानव जातीचा सर्वात मोठा धर्म आपण मानतो. ते खरेही आहे. पण जिथं स्वतःच्या घरीच पिण्यासाठी पाणी नसेल तर मग काय? आमच्याकडे पाणपोई हा विषयच त्या काळात नव्हता. आमच्या गावात किंवा परिसरात लग्नासाठी मुली देतनासुद्धा त्यांचे पालक दहादा विचार करायचे. आमच्याकडील सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणी आणि फक्त पाणीच. उन्हाळ्यात तर विचारूच नका. आमच्या गावाच्या बाजूला दोन नद्या आहेत. एक शहानुर व दुसरी पूर्णा. गावापासून जरा दूरच. त्या काळात नदीमध्ये झिरे



१५

लावले जायचे. झिरे म्हणजे नदीपात्रात खड्डा करून त्यामध्ये पाणी साचवायचे आणि रात्र रात्र जागून बंडीवर पखाली टाकून पाणी आणायचे अशी कसरत करायला लागायची. तीही रोज. पाण्याची शुद्धता वगैरे गोष्टी त्यावेळी कुणाच्या गावीही नव्हत्या. आता बाटलीबंद मिनरल वॉटर मिळते. पाणी शुद्ध करण्याची अनेक साधने निघाली आहेत. आज शुद्ध आणि थंड पाणी विकत मिळते. हे पाणी शुद्ध आहे, असं कंपनीला लिहावं लागतं. त्या काळी कुठं काय होत? जिथं, जसं पाणी मिळेल, तिथं तहान भागवणे, इतकंच महत्वाचं होतं. मी फार जुना काळ आपल्याला सांगत नाही तर १९८० च्या दशकातील परिस्थिती आपल्याला सांगतोय. त्या काळी आमच्या गावाला पाण्यासाठी जीवनदायीनी ठरली होती ती अकोट ची विहीर. तिचे पाणी आठवड्यातून एक दिवस यायचे. मग नळावर रांगा लागायच्या. त्या काळी पाणी साठवून ठेवण्यासाठी प्लास्टिक टाक्या नसायच्या. घरोघरी मातीचे रांजण असायचे किंवा जास्तीत जास्त लोखंडी कोठ्या असायच्या. श्रीमंताच्या घरी हौद होते. लोकांना पाणी नेण्यासाठी कावड असायची. त्याला १५ लिटरचे टपरी दोन तेलाचे डब्बे स्वच्छ धुऊन त्यात पाणी भरून ने-आण केली जायची. वस्त्यांमध्ये एक दोन नळाचे स्टॅण्ड असायचे. आतासारखे घरोघरी नळ नसायचे. अमक्या दिवशी नळाला पाणी येईल, असे माहीत होताच नळावर घरातील भांड्यांची लाईन लागायची. पाणी येण्याचा दिवस जवळ आला की भांडणांनाही ऊत यायचा. संस्कार, प्रामाणिकपणा, हितसंबंध, माणुसकी, सहकार्य वगैरे भारदस्त शब्द तेथे कामी यायचे नाहीत. ‘जिसकी लाठी उसकी भैस’, या न्यायाने ज्याचा घरात भांडण करण्याची ताकद आणि माणसे आहेत, ते पूर्ण पाणी भरायचे आणि जे लोक भांडणांना घाबरायचे ते एक दोन हंडे पिण्यापुरते पाणी भेटले तरी समाधान व्यक्त करायचे. त्यामुळे पाण्याची खरी किंमत आमच्याकडील लोकांना आहे. पाण्याची किंमत त्यालाच अधिक कळू शकते, ज्याला ते उपलब्ध होत नाही. माणसाला खरंच कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली तर त्याची किंमत राहत नाही. आजकाल आपण नेहमी पेपरमध्ये वाचतो. पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन अशा अनेक सामाजिक संघटना काम करताना दिसतात. अनेक पाणी सेवक तयार झाले आहेत. त्यांचं कार्यही जोरदार सुरू आहे. सामाजिक बदलसुद्धा होताना दिसत आहेत.

तरीदेखील आपल्याला जागोजागी पाण्याचा अपव्यय होताना दिसतो. ते कुठंतरी थांबले पाहिजे. आणि त्याची सुरुवात आपल्या स्वतःपासून झाली पाहिजे. अकबर आणि बिरबलच्या एका कहाणीमध्ये देवाला दुग्धभिषेक करायला दूध मागितले जाते त ते दूध एका टाक्यात टाकायला सांगितले जाते. रात्रीपासून ते काम सुरू होते. सकाळी महाराज अकबर ज्यावेळी त्या ठिकाणी येतात तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. बघतात तर काय टाक्यात दूध नसते तर पाणीच पाणी असते. सर्व जण हाच विचार करतात की सर्वच दूध आणणार आहेत, आपण थोडं पाणी टाकलं तर काय फरक पडणार? त्यामुळे शुद्ध दूध कुणीच आणत नाही. सगळेच पाणी भरतात. परंतु आपण तसे करून नाही चालणार नाही. सर्वानी आपली जबाबदारी समजून पाणी वाचविले पाहिजे व त्याची सुरवात आपण आपल्या घरापासून करूया. छोट्या-छोट्या गोष्टीतून आपण पाणी वाचवू शकतो. ते कसे हे सांगण्याची गरज आपल्यासारख्या सुजाण नागरिकांना खरे तर पडू नये. तरी आपापल्या परीने आपण संकल्प करूया. पाण्याचा अपव्यय रोखुया.

१६

तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे भविष्य नेहेमी वर्तविले जाते, ते काही उगाच नव्हे. ‘पाण्यासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा’ असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. म्हणून प्रत्येकाने या पाण्याचा वापर काटेकोरपणे करणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीपासून आपण पैसा काटकसरीने वापरतो. तसे पाणी वापरले नाही. पूर्वी म्हणायचे, पाण्यासारखा पैसे खर्च करू नको. पण आता पैशासारखे पाणी खर्च करू नको, असे म्हणायची वेळ आली आहे. कारण पाणी आता जेमतेम शिल्लक राहिले आहे.

तुळशीराम बोबडेे,

अंकुर साहित्य संघ, अकोला.

पैशासारखे पाणी खर्च करू नका... १७

णी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणून उपलब्ध पाणी अत्यंत काटेकोरपणे वापरणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. माणूस अन्नाशिवाय २१ दिवस, पाण्याशिवाय २ दिवस जिवंत राहू शकतो. मात्र, श्र्वासाशिवाय एक मिनिटही जगू शकत नाही. हा श्वास वृक्षापासून मिळतो. वृक्ष वाढण्यासाठी, जगविण्यासाठी गरज असते ती पाण्याची. यावरून प्राणीमात्रास व संपूर्ण जीवसृष्टीसाठी पाणी किती आवश्यक आहे, हे कळून येते. भारतात उपलब्ध जल संपत्तीच्या एक तृतीयांश पेक्षाही कमी पाणी वापरण्यायोग्य आहे. एकूण पावसापैकी भारताच्या भूभागावर जवळपास ५ टक्के पाऊस पडतो. आणि एका वर्षभरात केवळ १०० तास पाऊस पडतो. वैश्वीक वातावरण अनियमिततेमुळे दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे भारतातील जलस्रोत झपाट्याने घटत आहेत.

पा

पृथ्वी एक भाग व पाणी तीन भाग असले तरीही ९७ टक्के पाणी हे समुद्राचे आहे. ते क्षारयुक्त असल्यामुळे वापरण्यायोग्य नाही. भूगर्भातील पाण्याचे प्रमाण घटत चालले आहे. त्याला कारण आपणच आहोत. कारण आपण पाण्याचा वापर अमर्याद, विचारशून्य पद्धतीने करत आहोत. त्यात लोकसंख्या वाढही होत असल्यामुळे पाणी कमी पडत आहे. तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे भविष्य नेहेमी वर्तविले जाते, ते काही उगाच नव्हे. ‘पाण्यासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा’ असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. म्हणून प्रत्येकाने या पाण्याचा वापर काटेकोरपणे करणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीपासून आपण पैसा काटकसरीने वापरतो. तसे पाणी वापरले नाही. पूर्वी म्हणायचे, पाण्यासारखा पैसे खर्च करू नको. पण आता पैशासारखे पाणी खर्च करू नको, असे म्हणायची वेळ आली आहे. कारण पाणी आता जेमतेम शिल्लक राहिले आहे. पाण्याच्या बचतीसाठी काही उपाययोजना कराव्या लागतील. त्या बघुया.

१८

पाणी बचतीसाठी उपाययोजना अशा... १. पाणी टंचाई किंवा व्यवस्थापन केवळ शासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रतिज्ञाबद्ध व कटीबद्ध असले पाहिजे. २. स्नान, कपडे, भांडी धुण्याचे पाणी हे सडा टाकण्यास व झाडांना देण्यासाठी वापरता येईल. ३. नळाचा वापर गरजेपुरता करावा. गरज नसताना बंद ठेवावा. ४. गाड्या धुण्यासाठी पाईप ऐवजी ओला कपडा वापरावा. ५. सार्वजनिक नळ, व्हॉल्व लिक प्रूफ असावेत तसेच ते नेहेमी बंद ठेवावेत. ६. पाण्याला शिळे समजू नये व ते फेकून देऊ नये. ७. घरातील नळाला तोट्या व मीटर बसवावे. ८. पिण्यासाठी पाणी प्रथम आवश्यक तेवढेच घ्यावे. ९. लहान मुलांना या बाबतीत प्रशिक्षित करावे. १०. शेतात ठिबक सिंचन मडकी व सलाइनचा वापर करावा. ११. पाणी वाहून जाऊ न देता ते अडवावे व जिरवावे. १२. प्रत्येक घरी व इमारतीत पुनर्भरण व्यवस्था केलेली असावी.

१३. प्रत्येक व्यक्ती जलसाक्षर असावी. १४. पाणी वाचवणे म्हणजे पाणी निर्माण करणे असे समजावे. १५. शोष खड्डे, बोर पुनर्भरण, पाझर तलाव, बंधारे, शेततळे, नाले तयार करावेत. १६. रुंदीकरण, खोलीकरण, गाळ उपसा या बाबी अवश्य कराव्या. १७. प्रत्येक व्यक्ती पाणी शंभर लिटर वापरत आहे. पण गरज केवळ पन्नास लिटरची आहे. गरजेनुसारच पाणी वापरावे. १८. इस्रायल देशाने केलेल्या हरितक्रांतीचे अनुकरण करावे. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येकासाठी बंधनकारक असावे. १९. शॉवरचा वापर बंद करून बादली व मग चा वापर करावा. २०. लोकसंख्येवर पाण्याचे ऑडिट करावे. २१. ओवरफ्लोला निर्देशक असावे व त्याकडे लक्ष असावे. २२. वृक्षारोपण व संवर्धन करावे. २३. रेनवाटर हार्वेस्टिंग प्रत्येकासाठी बंधनकारक असावे. अशा विविध उपाययोजना राबविण्यात याव्या, जेणेकरून पाण्याचे व्यवस्थापन सुरळीतपणे होईल.

१९

पाणी

वाचवले

तरच

पिढ्या वाचतील

पाण्याला जीवन म्हटलेलं आहे, ते काही उगीचच नाही. आपल्या भारतामध्ये पिण्याच्या पाण्याची गरज नद्यांमुळे भागवली जाते. पण त्या नद्यांमध्ये पाणी येते कुठून? तर पावसाळ्यात पडणाऱ्या पावसातून. पण आधुनिकीकरणाच्या नावाखाली निसर्गाच्या चक्राची पार वाट लावून टाकली माणसाने. ज्या नद्यांचे पाणी अमृतासमान होते, ते पाणी कारखान्यातील दूषित रसायनामुळे प्रदूषित झाले. याला जबाबदार कोण?आधुनिकरणाच्या नावाखाली बेसुमार जंगलाची तोड करण्यात आली. याचा परिणाम पाण्याच्या चक्रावर झाला. जगात ८० टक्के पाणी आहे. पण त्यातील फक्त वीस टक्के पाणी पिण्यालायक आहे.

दिनेश मालटे ,

नव ते पाणीसुद्धा दूषित करायला निघाला आहे. जगातील एकच शहर पाणी विरहित शहर म्हणून घोषित होण्याच्या मार्गावर होते. त्यावरून धडा घेतला नाही तर एकामागून एक शहरे नक्की पाणी विरहित होत जातील. म्हणून पाण्याचा वापर काटकसरीने करा. जिथे एका बादलीत आंघोळ होते, तिथे एक तास शॉवरखाली का आंघोळ करायची? किती पाणी वाया जाते याचा जराही विचार माणूस करताना दिसत नाही. पाण्याचा वापर कसा करतात, याचं उदाहरण आमच्या खेडेगावातील महिला देऊ शकतात. कपडे, भांडी धुऊन जे पाणी उरते त्या पाण्याने त्या अंगणातील सडा सारवन करतात. म्हणजे पाण्याचे महत्व काय असते, हे त्यांना ठाऊक आहे. असेच एक सुखद

मा

अकोला

दृश्य स्वीडनमधील अतिदुर्गम भागात पाहायला मिळते. त्या भागात पाण्याची भीषण टंचाई आहे. तेथील लोकांनी यावर सुंदर असा उपाय शोधून काढला. त्यांनी हवेतील आद्रतेपासून पिण्यासाठी पाणी तयार केले. विशेष प्रकारची नेट तयार केली. त्यात पाईपची फिटिंग करून ते पाईप पाण्याच्या टाकीला जोडले. एक नेटमधून एका रात्रीतून एक हजार लिटर पाणी तयार होते. तेथील लोकांना पाण्याचे महत्व कळले. पण बाकीच्या लोकांचं काय? त्यांना केव्हा समजणार पाण्याचं महत्व? आज जगात अनेक संघटना आहेत, ज्या पाण्याबद्दल जनजागृती करीत आहेत. पाण्याचं महत्व सांगत आहेत. आपलेही कर्तव्य आहे की आपणही या संघटनांना सहकार्य करू या, म्हनजे भविष्यात आपल्याला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. २०

महासागर, नदियों, झीलों के भूमिगत जल और वर्षा जल के स्रोत जैसे विभिन्न स्रोतों से पानी हमारे पास आता है । पानी को बचाना और संरक्षित करना आज की आवश्यकता है । कई गांव पीने के पानी की बड़ी समस्या का सामना कर रहे हैं । पानी सभी के लिए बहुत महत्वपूर्ण है इसलिए अगर पानी नहीं होता तो पृथ्वी पर जीवन नहीं होता । पृथ्वी पर जल के बिना जीवन अस्तित्व में नहीं होगा ।

शांतला एस. हौदे, प्रिन्सिपल,

वेदांत पब्लिक स्कूल, पुणे.

जल

प्रकृति का अनमोल

उपहार

२१

ति, जल, पावक, गगन और समीर ये पाँच तत्व हमारे धर्मग्रंथों में मालिक कहे गए हैं तथा हमारी शारीरिक रचना में इनकी समान रूप से भूमिका होती है । इनमें वायु और जल ये दो ऐसे तत्व हैं जिनके बिना हमारे जीवन की कल्पना एक क्षण भी नहीं की जा सकती । जल एक तरल पदार्थ है जो अपने ठोस और गैस रूप में भी मौजूद है । अवस्था परिवर्तन करने का जल का यह स्वभाव उसके उपयोग के आयामों को विस्तृत कर देता है । जल यदि बरफ बनकर न रह पाता तो गंगा जैसी सदानीरा नदियाँ न होतीं और जल यदि गैस बनकर वाष्पित न हो पाता तो धरती पर वर्षा होने की संभावना न बचती । यही कारण है कि आज नदी जल, भूमिगत जल, कुएँ-बावड़ी का जल, समुद्र का जल और यहाँ तक कि वर्षा का जल भी कम या अधिक अनुपात में दूषित हो चुका है । इस विश्वव्यापी समस्या का कोई ठोस हल अभी तक सामने नहीं आ पाया है । हमारे देश के जलसंकट को दूर करने के लिए दूरगामी समाधान के रूप में विभिन्न बड़ी नदियों को आपस में जोड़ने की बात कही गई हैं । इसका बहुत लाभ मिलेगा क्योंकि नदियों का जल जो बहकर सागर जल में विलीन हो जाता है, तब हम उसका भरपूर उपयोग कर सकते है । इस प्रणाली से निरंतर जलसंकट झेल रहे क्षेत्रों के लोग पर्याप्त मात्रा में जल प्राप्त कर सकते हैं । जिस तरह इंदिरा गाँधी नहर बन जाने से राजस्थान की अतृप्त भूमि की प्यास बुझ सकी, ऐसे ही अन्य प्रयासों से देश भर में खुशहाली और हरियाली लाई जा सकती है । अन्यथा कावेरी नदी के जल के बँटवारे को लेकर जिस प्रकार का अंतहीन विवाद दक्षिण भारत के दो राज्यों के मध्य है, उसी तरह अन्य स्थानों पर भी जल को लेकर घमासान मच सकता है । पानी हम इंसानों के लिए प्रकृति का अनमोल उपहार है । हम पानी के बिना अपने दैनिक जीवन का नेतृत्व नहीं कर सकते । जीवित रहने के लिए सभी मनुष्यों, जानवरों और पौधों के लिए पानी आवश्यक है । पानी को बचाना और संरक्षित करना एक आवश्यकता बन गयी है क्योंकि पृथ्वी पर ताजे पानी की मात्रा बहुत कम है । बारिश ना होने के कारण पीने के पानी की मात्रा कम हो रही है । महासागर, नदियों, झीलों के भूमिगत जल और वर्षा जल के स्रोत जैसे विभिन्न स्रोतों से पानी हमारे पास आता है । पानी को बचाना और संरक्षित करना आज

क्षि

की आवश्यकता है । कई गांव पीने के पानी की बड़ी समस्या का सामना कर रहे हैं । पानी सभी के लिए बहुत महत्वपूर्ण है इसलिए अगर पानी नहीं होता तो पृथ्वी पर जीवन नहीं होता । पृथ्वी पर जल के बिना जीवन अस्तित्व में नहीं होगा । हम सभी को जल बचाना होगा और तभी हम पृथ्वी पर जीवन बचा सकते हैं । हमें पानी बचाने की पहल करने की जरूरत है, चाहे पानी की कमी हो या न हो, क्योंकि पानी के बिना हमारी धरती नहीं रहेगी तथा पानी के बिना हम इंसान मर जाएंगे । पानी बचाना धरती पर जीवन बचाने जैसा है । हमें पानी बचाना चाहिए । हम सभी को इस समस्या का एहसास होना चाहिए और पानी बचाने के लिए प्रयास करने चाहिए । जलम्॒ जल स्थानगतिम् सर्वथा एव रक्षणीयम्। जन्तूनां सुख जीवनं हेतु जलस्य रक्षणम् नूनं भवतु। निर्मल जलं सपांदनीयम् जल संरक्षणम् अनिवार्यम्। अभोजनेन जीवितुम् भवेत् विना जलं सपांदनीयम्। किंचित् जलमपि पीतम् दाहं कष्टं करोति दूरम्। शुष्कं तपनं हाहाकारः जल संरक्षणम् परिहारकः।।

२२

जल

संवर्धन पाण्याला आपल्याकडे जीवन म्हटलं आहे. पाण्यावर आपण सगळेच अवलंबून असतो. असं असलं तरी अजूनही महाराष्ट्रात दोन­-दोन, तीन­ -तीन किलोमीटरवरून महिलांना पाणी आणावं लागतं. एक फार अर्थपूर्ण वाक्य आहे, “जेव्हा एखादी स्त्री लांब जाऊन पाणी आणते, तेव्हा कमी पाण्याची नसते तर कमी असते न्यायाची.” २०११च्या जनगणनेनुसार साधारण ६८% महाराष्ट्र नळानं येणारं पाणी पितो. निम्म्या ग्रामीण भागात घरांमध्ये पाणीपुरवठा नाही. ज्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळानं होतो अशी घरं फक्त ५६% आहेत. जवळजवळ महाराष्ट्रातील १३% घरांना लांबवरून पाणी आणावं लागतं. याचा अर्थ महाराष्ट्राची स्थापना होऊन ५४ वर्ष झाली तरी सर्वांच्या घरापर्यंत आपण पाणी पोचवलेलं नाही. घरात शुद्ध पाणी नसेल तर अशुद्ध पाण्यामुळे रोगराई होते, त्यावर खर्च होतो, स्त्रियांना फार लांबवरून पाणी आणावं लागत असल्याने त्यांना पाठीचे­-मणक्याचे आजार होतात आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर जायचं असेल तर ही परिस्थिती आपल्याला बदलावीच लागेल.

व्हाईट स्पेस, पुणे/मुंबई.

२३

९७.८%

घरांना महाराष्ट् रात नळानं पाणी-पुरवठा होतो.

३०.७% १७.५%

२०%

मुंबई

२.०% नांदे ड

उस्मानाबाद

कोल्हापूर

२५.४% २२.५%

६७.९%

११.६%

मुंबई सिंधुदर्ग ु गोंदिया

लोक पाणी शुद्ध न करता पितात.

१.७% मुंबई

१३.१%

वाशिम

३२.२%

लोकांना महाराष्ट् रात लांबून पाणी आणावं लागतं.

शहराच्या पाण्याच्या एकूण गरजेच्या ३३ टक्के पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी, शहरांत पाण्याच्या आणखी टाक्या बांधाव्या लागतील. पाणी क्षेत्रात धोरणात्मक सुधारणा राबविण्याची व त्यासाठी यंत्रणेस प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याची गरज आहे. २४

ज्यातील पाऊस मोठा बेभरवशाचा आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांना पाणी पुरवठा करणारी धरणे भरण्याइतपतही पाऊस काही वर्षात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडत नाही. यामुळे वारंवार पाणीकपातीच्या संकटाचा सामना करावा लागतो. सध्या कृत्रिम पावसाचं तंत्रज्ञान प्रगत झालं आहे. पुण्या – मुंबईसारखा अनुभव इतर ठिकाणीही येत आहे. लातूरसारख्या शहरांना आठवड्यातून एकदा तर बुलढाण्यासारख्या शहरांना पंधरा दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाचा हा अनुभव लक्षात घेता कृत्रिम पाऊस पाडण्याची योजना राबविण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी दरवर्षी करुन ठेवण्याची आवश्यकता आहे. राज्याच्या अंदाजपत्रकात दरवर्षी असा पाऊस पाडण्यासाठी येणार्‍या खर्चाची तरतूद करावी लागेल. शहरांची वाढ यापुढे किती होऊ द्यायची याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. शहराच्या नियोजनांत इतर अनेक बाबींसोबतच पुरेशा पाण्याची उपलब्धता हा एक महत्वाचा घटक आहे. पुण्यासारख्या शहरात चार­चार धरणे डोक्यावर असताना पाणी कमी पडू लागले आहे. यामुळे वाढत्या पाण्याची गरज भागविण्यासाठी भामा आसखेड धरणाचे पाणीही पुण्याला आणले जात आहे. याचाच अर्थ पाण्याची मागणी व पाण्याचा पुरवठा याचा ताळमेळ बसत नाही. राज्याच्या बहुतेक शहरांत अशीच स्थिती असल्याने यापुढील काळात शहरांची वाढ रोखण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने प्रयत्न करावे लागणार आहेत. उपलब्ध पाण्याचा विचार करुन शहरांना यापुढील काळात किती फुगू द्यायचे याचा विचार करावा लागेल. पुणे शहराच्या लोकसंख्यावाढीत ५०% वाटा स्थलांतरितांचा आहे. इतरत्रही जवळपास हीच स्थिती निर्माण होऊ घातली आहे. लोकांना सामावून घेण्याची शहरांची नैसर्गिक क्षमता संपली असल्याने या बाबीकडे आता गांभीर्याने पाहावे लागणार आहे. स्थलांतरित वा परप्रांतीय हा राजकारणाचा विषय न करता त्याची सांगड नागरिकांच्या पाण्याशी व पर्यायाने त्यांच्या जीवनमरणाशी घालण्याची वेळ आली आहे. पुणे, पनवेल, ठाणे, सावंतवाडी, कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूर, लातूर अशा शहरांत असणार्‍या तलावांची मोठी दुरवस्था झाली आहे. असे तलाव बांधकामांच्या राडारोड्यानं पूर्णपणे भरले आहेत, तर काही ठिकाणी पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. अशा तलावांचं तसेच विहिरींचं जतन करण्यासाठी

रा

ठोस उपाययोजनांची गरज आहे. पाणी पुरवठा करणार्‍या धरणांची पाणी­साठवण­ क्षमता वाढविण्याची गरज आहे. कारण थोडा जास्त पाऊस झाला की धरणं भरतात व धरणातून पाणी खाली सोडून द्यावं लागतं. परत उर्वरित पावसाळ्यात अपेक्षेनुसार पाऊस पडत नाही व धरणे अर्धवट भरली जातात. ही बाब लक्षात घेता राज्यातील धरणांची ठराविक उंची वाढवून त्यात जास्तीचं पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. पाणी­वाटप लवादाच्या निवाड्यानुसार अपेक्षित पाणी खाली सोडून देऊन जास्तीचं पाणी अशा प्रकारे धरणांमध्ये अडविता येऊ शकतं. राज्यातील विविध शहरांत बांधकामाचा दगड काढण्यासाठी दगडखाणी काढल्या आहेत. तळ­ कोकणांत चिरेखाणींचे प्रमाण मोठं आहे. अशा खाणींतील दगड काढण्याचे काम संपल्यानंतर त्यात राडारोडा न टाकता त्यांचा वापर पावसाचं पाणी साठविण्यासाठी करण्याची गरज आहे. यामुळे आसपासच्या भागांतील भूजल­पातळीत वाढ होण्यास मदत होऊ शकते. यापुढील काळात नव्या-जुन्या तसेच लहानमोठ्या सर्व इमारतीवर पडणारं पावसाचं पाणी साठविण्याचं काम हाती घ्यावं लागेल. त्यासाठी बिल्डर लॉबीचं प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. यापुढील काळात प्रत्येक गावांत तसंच विविध शहरातील प्रत्येक पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमापन केद्रांची उभारणी करावी लागतील. प्रत्येक गावांत या शहरांच्या विविध पाणलोटात पडणार्‍या पावसाच्या स्वतंत्र नोंदी ठेवल्यानं पाण्याचं नियोजन करणं सोपं होऊ शकतं. यापुढे केवळ धरणातील पाण्यावरच अवलंबून न राहता शहरातील भूजलाचा वापर करण्याचंही नियोजन व्हावं. सार्वजनिक क्षेत्रानं भूजलाचा वापर केला नाही तरी शीतपेयांच्या कंपन्या, तसेच खासगी पाण्याचे टॅंकर चालविणारी मंडळी भूजलाचा मोठ्या प्रमाणांत उपसा करत आहेत. पाण्याचा मोठ्या प्रमाणांत व्यापार केला जात आहे. ग्रामीण वा नागरी भागातील पाणी नियोजनाचा विचार करताना धरणातील पाणी¸ भूजल, विविध तलाव, तळी विहिरी तसंच खाणीत साठलेलं पाणी, छतावरुन अडविलेलं पाणी अशा सर्व प्रकारच्या पाण्याचा विचार करावा. तसंच पाण्याच्या या स्त्रोतांचं संवर्धन करण्यास प्राधान्य द्यावं लागेल. ग्रामीण तसंच शहरी भागांत सेप्टीक टॅंक असणार्‍या शौचालयांचा मोठा वापर केला जातो. अशा शौचालयात फ्लश करण्यासाठी पाण्याचा मोठा वापर होतो. त्यामुळे सांडपाणी निर्माण होण्याचं प्रमाणही वाढतं. कमी पाण्यात मैला वाहून नेणार्‍या

२५

तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करुन शौचालयांतील पाण्याची गरज कमी करणं, प्रत्येक इमारत व कंपनीमधून बाहेर पडणार्‍या पाण्यावर प्रक्रिया करणं तसंच शहरातील बागा, गॅरेजेस, जलतरण तलाव तसंच इतर व्यापारी आस्थापनांसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणं बंधनकारक करावं लागेल. पाण्याचा वापर कमी करण्यासाठी घरांत वा कारखान्यात येणार्‍या व बाहेर पडणार्‍या अशा दोन्ही प्रकारच्या पाण्यावर यापुढील काळात शुल्क लावण्याची गरज आहे. पाण्याचा गैरवापर करणारे व पाण्याच्या स्त्रोत प्रदूषित करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील बहुतेक शहरातील जुन्या व कालबाह्य जलवाहिन्या कालबध्द पध्दतीने बदलण्याची गरज आहे. चांगल्या दर्जाचे पाणी मीटर उपलब्ध करुन यापुढे पाणी मोजून देण्याची यंत्रणा उभारावी लागेल. धरणातून पाणी घेण्याच्या जागेवर, तेथून पुढे प्रत्येक जलशुध्दीकरण केंद्राला पाणी पुरविण्याच्या ठिकाणी तसेच पुढे वितरण व्यवस्थेत पाणी देताना व शेवटी प्रत्येक ग्राहकाच्या घरी पाणी­मीटर बसविण्याची गरज आहे. पाण्याचा वापर परिणामकारकरीत्या करण्यासाठी दरवर्षी, पाण्याचं सामाजिक अंकेक्षण करण्याची जबाबदारी मनपाच्या पाणी यंत्रणेवर सोपवावी लागेल. बर्‍याच शहरांत दूर अंतरावर असणार्‍या धरणांतून पाणी वाहून आणलं जातं. काही शहरांत पाणी वाहून आणण्यासाठी बंद नळाचा वापर केला जातो तर काही शहरांत नदी­पात्रातून अथवा पाटबंधारे कालव्यातून पाणी वाहून आणलं जातं. पाण्याचा व्यय टाळण्यासाठी यापुढील काळात उघड्या कालव्यातून वा नदी पात्रातून पाणी वाहून आणणं पूर्णत: थांबविण्याची गरज आहे. शहराचा विकास नियोजनबध्द पध्दतीने केल्यास नवीन विकसित होणार्‍या भागांत आवश्यक त्या क्षमतेच्या जलवाहिन्या टाकण वा तत्सम स्वरुपाची काम करण शक्य होईल राज्यातील सर्व नागरी स्थानिक संस्थाकडे शहरातील नव्या जुन्या सर्व जलवाहिन्यांचे अद्ययावत नकाशे असण्याची गरज आहे. तसच सर्व नागरिकांना समान दाबाने व दराने पाणी मिळण्यासाठी वितरण व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच शहराच्या पाण्याच्या एकूण गरजेच्या ३३ टक्के पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी, शहरांत पाण्याच्या आणखी टाक्या बांधाव्या लागतील. पाणी क्षेत्रात धोरणात्मक सुधारणा राबविण्याची व त्यासाठी यंत्रणेस प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याची गरज आहे.

राज्याला ७२० कि.मी. लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. किनारपट्टीत बसलेल्या मुंबई, ठाणे, रत्नागिरी, अलिबाग व सिंधुदुर्ग या शहरांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा वापर करण्याची योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याची गरज आहे. चेन्नई शहराने या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा याकामी उपयोग करुन घेणं शक्य आहे. दामोदर नदीखोर्‍यात डॉ. आंबेडकरांनी यशस्वीपणे वापरलेल्या खोरेनिहाय जलसंपत्ती विकासाच्या तत्वांचा वापर, यापुढील काळात राज्यातील जलसंपत्ती विकास कार्यक्रमांत करण्याची नितांत गरज आहे. यापुढील काळात केवळ सिंचनासाठीचे प्रकल्प न उभारता बहूउद्देशीय पाणी प्रकल्पांची उभारणी करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकल्पातील पाण्याचा वापर करताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्याचबरोबर सिंचनासाठी, उद्योगांसाठी, पर्यावरण रक्षणासाठी, पर्यटनासाठी तसंच विद्युत-निर्मितीसाठी लागणार्‍या पाण्याची तरतूदही याच प्रकल्पातून करावी लागणार आहे. अशा प्रकारचे बहूद्देशीय प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असणारा निधी केवळ पाटबंधारे विभागाकडून उभा न करता, भविष्यात होणार्‍या संभाव्य लाभाच्या प्रमाणांत संबंधित असणार्‍या प्रत्येक विभागाकडून आणि इतर क्षेत्रामधूनही उभा करण्याची आवश्यकता आहे.

२६

हे असं का होतं? याच्या पाण्याचा प्रश्न

गरी भागातील पिण् महाराष्ट्राच्या ग्रामीण व ना्यांवरुन प्रयत्न केले जात आहेत. पाणी पुरवठा पातळ देशातील सोडविण्यासाठी विविध ता­ ा लागू करणारं महाराष्ट्र हे वारे पिण्याचं ण ार ध ु स त त्रा क्षे च्छ स्व यंत नळाद् आणि सार्वजनिक ज्यातल्या प्रत्येक कुटुंबापअर्नेक कारणं आहेत... रा ही न ू स अ ं स अ . हे आ याची पहिलं राज्य अयश्स्वी ठरलो आहोत. त् पण आ यात ् वण च पो ी ण पा संस्थाच्या क्षमता ा वठ र पु ी ण पा ५. बांधणीचा अभाव. १. पाणी पुरवठा ती प्र ं ना योज ११. केवळ योजनांच्या नियोजन, ारांमध्ये ीद ाग भ ी, ण बांधकामाधारीत अंमलबजाव नास्था अ ी ार ण स अ ोयी सुविधा निर्माण स संनियंत्रण व या ् ीच क ल व स्वमा करण्यावर दिला मूल्यमापन या . ाव भ अ ा च ने ाव भ जाणारा भर. महत्वाच्या टप्प्यांमध्ये ६. पाणी पुरवठा व ना स्थानिक जनतेच्या ंच्या १२. ७३ व ७४ घट ना ोज य ता च्छ स्व दुरुस्तीतील सहभागाचा अभाव. दुरुस्तीकडे ाल भ ख दे े ार ण पड े तरतुदींकडे केले र्लक्ष. २. वारंवार कोरड दु े ार ाण ज े ल े क जाणारे दुर्लक्ष. पिण्याच्या पाण्याचे ेळोवेळी होणारा ु े व ७. या सर्व कारणांमळ स्त्रोत. प. हस्तक्षे ीय क ज रा ग्रामीण व नागरी ३. राज्याच्या विविध ासकीय यंत्रणेची श ८. भागातील पिण्याच्या भागांतील ता. ीन ास उद पाण्याच्या प्रश्नाची पर्जन्यमानात ल री ाव ण प्रमा या ोठ् ९. म तीव्रता वाढताना असणारी विषमता. . ार च ष्टा भ्र दिसत आहे. स्था ं ४. पुरवठा आधारित स ज रा त ाय च पं . १० धोरणाचा केला व स्थानिक स्वराज्य जाणारा पुरस्कार.

२७

काय करायला हवं? शुध्द, पुरेसे, सुरक्षित व शाश्वत स्वरुपातील पाणी प्रत्येक नागरिकाला पुरविणे ही राज्याची जबाबदारी आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या जगण्याच्या व उपजिविकेच्या हक्काचा व पाण्याचा परस्पर जवळचा संबंध आहे. त्याचा संकोच होऊ नये म्हणून यापुढील काळात राज्याला दक्षता बाळगावी लागणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी पाण्यावरील सामुदायिक मालकी मान्य करण्याची गरज आहे. आरोग्य, आर्थिक विकास, दारिद्र्य निर्मुलन

व पाणी पुरवठा यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. समाजातील दुर्बल घटक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिल्यास ते दारिद्र्याच्या खोल गर्तेत अडकण्याचा धोका आहे. हे टाळण्यासाठी पाण्याला आर्थिक वस्तूचा दर्जा देणे, पाण्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी बाजार व्यवस्थेवर सोपविणे तसेच पाणी क्षेत्रात खाजगी क्षेत्राचे वर्चस्व निर्माण होऊ देणे योग्य नाही. ग्रामीण व नागरी भागातील स्थानिक भागीदार व सार्वजनिक क्षेत्राचे परस्पर सहकार्य तसेच त्यांच्या क्षमता बांधणीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडविता येणे शक्य आहे. त्यासाठी गावपातळीवरील गरज पडताळणी, नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रण इत्यादी विविध टप्प्यात भागीदारांचा विशेषत: महिला, तरुण व समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग असणे

२८

आवश्यक आहे. गावपातळीवरील पंचायत राज व्यवस्था, महिला ग्रामसभा व सर्वसाधारण ग्रामसभा तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग समित्यांना पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात बळकट करावे लागेल. या कामाचा भाग म्हणून त्यांच्या प्रबोधनाचं काम मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या सुविधांवर स्थानिक जनतेची स्वामित्वाची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. लोकवाट्याची १०% रक्कम व देखभाल दुरुस्तीची १००% रक्कम यापुढील काळात ठेकेदाराला भरायला लावण्याचे प्रकार थांबवावे लागतील. त्यातले “ठेकेदार राज” संपवावे लागेल. पाणी सुविधांच्या कामात आपलाही वाटा आहे ही भावना वाढीस लागण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. पाणी सुविधांच्या झालेल्या कामांची गुणवत्ता व प्रगती याबाबतचा नियमित सामाजिक लेखाजोखा सर्वांसमोर मांडण्याची आवश्यकता असून, सर्वसमावेशकता, पारदर्शकता तसेच सामुहिक उत्तरदायित्व इ. तत्वांची कास पुढील काळात धरावी लागेल. महाराष्ट्राला टॅंकरमुक्त तर करायला हवेच; पण त्याआधी हंडामुक्त करण्याची गरज आहे. यापुढील काळात महिलांना डोक्यावरुन पाणी आणावे लागणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. हंडामुक्त महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी गावातील वा शहरातील प्रत्येक कुटुंब, अंगणवाडी व शाळेला शुध्द, पुरेशा, सुरक्षित व शाश्वत स्वरुपातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागेल. तसेच स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्या लागतील. नागरी भागातील प्रत्येक वॉर्ड तसेच प्रत्येक गावाला हागणदारीमुक्त बनविण्यासाठी लोकांच्या स्वच्छतेच्या सवयी बदलण्यासाठी फार पद्धतशीर प्रयत्न करावे लागतील. आजपर्यंत, पाणी पुरवठ्याच्या योजना, भूजल संवर्धनाच्या योजना, छतावरील पाणी संकलनाच्या योजना तसेच मृदसंधारणाच्या व जलसंधारणाच्या योजना वेगवेगळ्या खात्यांमार्फत, वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या ठिकाणी राबविल्या जात

असल्याने त्यांचा एकत्रित परिणाम दिसत नाही. सदर बाबी यापुढे कटाक्षानं टाळाव्या लागतील, तसंच पाण्याच्या कोणत्याही एकाच स्त्रोतावर अवलंबून न राहता विविध स्त्रोतांचा विचार करावा लागणार आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करताना भूजल संवर्धन, छतावरील पाणी संकलन, मृद­संधारण व जलसंधारण तसेच इतर सर्वसमावेशक उपाययोजना हाती घ्याव्या लागतील. केवळ पाणी पुरवठा सुविधांची केवळ संख्या न वाढवता गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचं बळकटीकरण करण्यास प्राधान्य द्यावे लागेल. जलस्वराज्य प्रकल्प अथवा “आपलं पाणी”सारख्या प्रकल्पांत गावाच्या मदतीसाठी नेमलेल्या तांत्रिक सेवा पुरवठादारांनी, गावांना परवडणार्‍या पाणी­सुविधा तयार करण्याऐवजी अत्यंत महागड्या पाणी-पुरवठा सुविधा लोकांच्या माथी मारल्या आहेत. पुण्यासारख्या शहरांत गरजेपेक्षा जास्त पाणी धरणांतून उचललं जातं आहे, मात्र प्रत्यक्षात लोकांना पुरेसं पाणी मिळतच नाही. यामुळे जास्तीचं पाणी जातं कुठं हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. भविष्यात अशा प्रकारांना पायबंद घालावा लागेल. पाण्याचं ऑडिट करण्याची प्रथा सुरू करावी लागेल. महिला व युवकांना पाणी वापर गट, उपभोक्ता गट तसंच बचत गटाच्या माध्यमातून संघटित करून पाणी व्यवस्थापनात सक्रिय सहभागी करून घ्यावं लागेल. अशा रीतीनं संघटित झालेल्या महिला व युवक गटांच्या मदतीनं उद्योग – व्यवसाय तसंच स्वयंरोजगार निर्मितीस चालना देणं शक्य आहे. गावामध्ये सामूहिक कोषाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्याचा विचार करता येऊ शकतो. पाणी पुरवठा करणार्‍या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पर्यावरण संवर्धनाची तसंच वृक्षलागवडीची कामं हाती घेण्याची गरज आहे. धरणांत येणारा गाळ रोखण्यासाठी तसंच धरणांची पाणी साठवण क्षमता टिकवून ठेवण्यासाठी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वंकष पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांचा मोठा उपयोग होऊ शकतो. धरणांच्या जलाशयातील बाष्पीभवनामुळे वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी धरणांच्या जलाशयांच्या काठावर गर्द वनराई असणं उपयुक्त ठरु शकते.  (व्हाईट स्पेस रिसर्च टीम)

२९

प्राचार्यांच्या डेस्कवरून

कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा.

जागतिक महिला दिन

कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा (अहिंसातिर्थ) येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मा. ब्रम्हकुमारी स्नेहलता दीदी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी मा. सौ. मनोरमा माणिकराव जोगदंड या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्जवलनाने झाली. प्रमुख पाहुण्या मा. ब्रम्हकुमारी स्नेहलता दीदी यांनी नारी शक्ती या विषयावर मार्गदर्शन केले तर अध्यक्ष मा. सौ. मनोरमा माणिकराव जोगदंड यांनी स्त्री जीवन प्रेरणादायी या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर गावातील प्रतिष्ठित महिला सौ. सुभिताबाई जोगदंड, सौ . सुशीला जोगदंड, सौ. शशिकला जोगदंड, सौ. लक्ष्मी जोगदंड, सौ. ज्योतीताई जोगदंड आणि सौ. वृंदाताई बंसोड या उपस्थित होत्या. याप्रसंगी प्रथम वर्षातील विद्यार्थी अविनाश कांबळे आणि

भाग्यश्री शितोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाचा विद्यार्थी राहुल अंधारे व प्रस्ताविक संकेत राऊत यांनी केले तर कृषि महाविद्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अविनाशजी जोगदंड यांनी सर्वांचे आभार मानले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातर्फे सर्व मान्यवरांचा पुष्प आणि प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. जाधव, मा. अजिंक्य पिसाळ सर (कृषि अधिकारी), प्रा. पी. टी. निचळ, डॉ. आर. एस. करंगामी, प्रा. पूर्वी गुप्ता मॅडम, प्रा. मोक्षदा पाटील मॅडम, आरती पंचबुद्धे मॅडम व सर्व प्राद्यापक वृंदाचे मार्गदर्शन लाभले.

३०

प्राचार्यांच्या डेस्कवरून

सावित्रीबाई फुले पुण्यतिथी कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा येथे सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रमाता सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सावित्रीबाई फुलेंचे सामाजिक कार्य फार महान आहे. स्री शिक्षणाची कवाडे सावित्रीबाई यांनी महिलांना उघडून दिली. त्यामुळे आज

महिला उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर आहेत. त्यांनी सावित्रीबाई यांचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी मांडले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. जाधव, प्रा. पी. टी. निचळ, डॉ. आर. एस. करंगामी व सर्व प्राध्यापक वृंदाचे मार्गदर्शन लाभले.

नेहमी सकारात्मक भावना ठे वा : वेथाड कर्तबगार साखर कारखान्याचे मालक वेथाड सर यांचे मार्गदर्शन

मा. विक्रम वेथाड सर (कर्तबगार साखर कारखान्याचे मालक) यांनी कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचे विद्यार्थ्यांसोबत एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी वेथाड सर यांनी त्यांच्या आयुष्याच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती दिली. वेथाड सरांनी विद्यार्थ्यांना नेहमी सकारात्मक भावना ठेवायला सांगितले. त्यांनी साखर कारखान्याविषयी आणि कृषि क्षेत्रातील संधी आणि आव्हाने संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कृषि महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अविनाशजी जोगदंड सर यांचे मार्गदर्शन लाभले. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. जाधव, प्रा. पी. टी. निचळ, डॉ. गजानन एच. वसू , डॉ. आर. एस. करंगामी आणि सर्व प्राध्यापक वृंद हजर होते. ३१

प्राचार्यांच्या डेस्कवरून

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क ’ (यिन) यांची भेट

र्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा येथे करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे. यात प्रत्यक्ष कामाचा



अनुभव व प्रात्यक्षिकांमधील कौशल्ये शिकवण्यात येणार असून, त्याद्वारे प्रशिक्षणार्थींना उद्योजक किंवा कुशल कर्मचारी म्हणून भविष्यात करियरच्या चांगल्या संधी मिळू शकतील, या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वर्गाच्या भिंतींच्या चौकटीपलीकडे जाऊन प्रशिक्षण, हे या अभ्यासक्रमाचे वेगळेपण आहे. प्रत्यक्ष व्यवहारात सहजपणे वापरता येऊ शकेल असे प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण यातून मिळेल.

या उपक्रमाद्वारे ध्येयवादी विद्यार्थी व प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून मूल्याधारित समाजाची निर्मिती होईल. कृषि महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अविनाशजी जोगदंड सर यांचे याप्रसंगी मार्गदर्शन लाभले. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. जाधव, प्रा. पी. टी. निचळ, डॉ. गजानन एच. वसू , डॉ. आर. एस. करंगामी, मा. नितीन एस. जोगदंड सर आणि सर्व प्राध्यापक वृंद हजर होते. ३२

मुख्याध्यापकांच्या डेस्कवरून

होळी उत्साहात साजरी..! वेदांत पब्लिक स्कू ल, पुणे

विविध सणांपैकी एक असलेला होळी. या सणाला एक वेगळेच महत्व आहे. पौराणिक दंतकथेनुसार या सणाचे विशेष महत्व म्हणजे वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टीने मात करून विजय मिळवणे. अश्या या होळी सणाचे महत्व वेदांत पब्लिक स्कूल, पुणे येथील शाळकरी मुलांना उदाहरणे देऊन समजावण्यात आले. एकमेकांनवर रंगांची उधळण करून रंगपंचमी साजरी करण्यात आली. मोकळ्या निसर्गात जमलेल्या मुलांनी मनसोक्त रंग खेळून रंगपंचमीचा आनंद लुटला.

पुनः नवी सुरुवात...

कोरोना कधी थांबेल आणि पुन्हा कधी शाळा सुरू होतील, याकडे चिमुकल्यांसह सगळ्यांचेच लक्ष लागलेले होते. अखेर प्रतीक्षा संपली अन् शाळा पूर्ववत सुरू झाल्या. पुन्हा एकदा वेदांत पब्लिक स्कूल, पुणे येथील शाळेत किलबिलाट ऐकायला मिळाला. नेहमीप्रमाणे राष्ट्रगीत,

प्रार्थना - वंदनाने शाळेची सुरुवात झाली. लॉकडाऊनच्या काळात बंदिस्त असलेली मुले आता शाळेतील वातावरणात मिसळायला लागली आणि गोडीने, हसत-खेळत अभ्यासात रुजू झाली. या सगळ्या वातावरणात मुले आणि शिक्षक यांच्यातील संवाद परत एकदा बहरलेला पाहायला मिळाला. ३३

मुख्याध्यापकांच्या डेस्कवरून

होळी रे होळी

पला भारत देश सणांचा देश म्हणून ओळखला जातो. लोक सणांच्या निमित्ताने एकत्र येतात, आनंद आणि प्रेम व्यक्त करतात. याच सणांपैकी एक महत्वाचा सण म्हणजे होळी. होळी हा सण वसंत ऋतूत म्हणजे हिंदू फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणाला रंगाचा सण म्हणूनही ओळखले जाते. होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होलिका दहन व दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते. होळीच्या दुसऱ्या दिवशी लोक एकत्र जमतात व एकमेकांना रंग लावून धुलीवंदन साजरे करतात. सर्व लोक आपापसातील वाद मतभेद विसरून एकमेकांना रंग लावतात. या दिवशी लोक घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतात. लोक एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात. संगीत वाजवून, नृत्य करून आनंद व्यक्त करतात. सगळीकडे आनंद व उत्साहाचे वातावरण



वेदांत पब्लिक स्कू ल, कारंजा

असते. होळी हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो. हा सण केवळ हिंदूच नव्हे तर सर्व समाजातील लोकही आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. म्हणूनच या सणाला एकता आणि एकात्मतेचा सणही म्हटले जाते आणि हेच या सणाचे खरे वैशिष्ट्य आहे. याच दिनाचे औचित्य साधून वेदांत पब्लिक स्कूल, कारंजा येथे होळी हा सण साजरा करण्यात आला. या दिवशी मुलांनी धुलिवंदनाचा खूप आनंद घेतला. शिक्षकांनी मुलांना होळी या सणाची माहिती दिली व होळी हा सण का साजरा करतात, याबद्दल सांगितले. तसेच विविध रंगाबद्दल माहिती दिली. कोणता रंग कशासाठी वापरला जातो, त्याचे महत्त्व काय आहे, हे पटवून दिले व चिमुकल्या मुलांच्या हातांचे रंगीबेरंगी छापे घेऊन त्यांनी ज्या रंगाचा छापा दिला त्या रंगाबद्दल माहिती दिली. मुलांनी एकमेकांना रंग लावून व नृत्य करून होळी हा सण उत्साहात साजरा केला.

३४

मुख्याध्यापकांच्या डेस्कवरून

जागतिक चिमणी दिवस

वेदांत पब्लिक स्कू ल, पोहा

मी देईन तुला ग चारा, मी देईन तुला ग पाणी

वेदांत पब्लिक स्कूल, पोहा येथे २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा झाला. या अनुषंगाने वेदांत वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे भांडे तयार केले व ते शाळेतल्या परिसरामध्ये झाडांवर बांधले.  आमची वर्गात याविषयी चर्चा झाली की, आपल्या इकडच्या कडक उन्हात

आपण पक्ष्यांच्या खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे. आपल्याला जमेल तसे, आपल्याकडील उपलब्ध गोष्टींचा उपयोग करून आपण हे काम करू शकतो. विदयार्थ्यांनी त्यांच्या घरी पक्ष्यांसाठी घरटे, पाणी पिण्यासाठी भांडी, खाण्यासाठी धान्य ठेवले.  मुलांचे मन संवेदनशील असते. ही संवेदनशीलता पक्ष्यांप्रति जपण्याचा विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीने पुरेपूर प्रयत्न केला. त्या सर्वांचे अभिनंदन. ३५

The Award Ceremony

The Award Ceremony, which was held on 11th of March 2022 At –Bal Gandharva Ranga Mandir. MCCIA’s – Mr. G. S Parkhe “INNOVATION IN ENTREPRENEURSHIP” AWARD

gives us great pleasure to announce that M/s. Ramelex Pvt Ltd has been chosen for the MCCIA’s – Mr. G. S Parkhe “INNOVATION IN ENTREPRENEURSHIP AWARD” – 2021-2022. For innovating “RAMELEX SAVER ASSEMBLY”. The award was given to M/s.

It

Ramelex Pvt Ltd, which demonstrates exceptional courage and devotion towards duty on work front. It is a prestigious honour that serves to recognize the best of the best within our ranks. The unique innovation is named “RAMELEX SAVER ASSEMBLY” The saver assembly was made to provide addition strength to the

conductor for preventing from falling down due to broken tension clamp. Basically Saver Assembly is to protect the snapping of conductor. It can save snapping via bypassing the tension clamp, through connecting one end of Saver Assembly to the yoke plate and another one near to the conductor side.

३६

“Women are the Architects of Society”

We at M/s. Ramelex Pvt Ltd celebrated our Managing Director Mr. ANIRUDDH JOGDAND Birthday on 12th March.

Ramelex Pvt Ltd salutes all the Women out there who are doing wonders all around the Globe and making their Nation proud. Ramelex Pvt Ltd also celebrated Women’s Day programme on 8th of March 2022. The success of every Women should be the Inspiration to another. We should raise each other up. Make sure you’re very COURAGE’S: be Strong be extremely KIND and above all be HUMBLE.

Another feather in the Cap for M/s. RAMELEX Pvt Ltd performed excellent Erection, Mounting, Jumpering, Commissioning and Testing job at JSW Dolvi. Of 220kV SF6 Breaker replacement work has been done successfully Complete new set-up done.

३७

कृषि पर्यटन व्यवसायाला शेती जोडधंदा म्हणून आपण व्यापक स्वरूप आणू शकतो. शेतकऱ्यांनी शेतीत चांगल्या प्रकारे नियोजन करून शाश्वत विकासाद्वारे शेती करायला पाहिजे. शेतकरी लहान मोठ्या प्रमाणात या व्यवसायात उतरत आहेत. पर्यटन हा शब्द मोठा वाटत असला तरी यातील काही बाबी आपण आपल्या शेतामध्ये व परिसरात नेहमी राबवत असतो. त्यामुळे थोडेसे प्रशिक्षण घेतले किंवा पर्यटन केंद्र प्रत्यक्ष पाहिली तर निश्चित कृषि पर्यटन म्हणजे काय हे आपण दुसऱ्या व्यक्तींना सांगू शकतो किंवा पटवून देऊ शकतो.

डॉ. रविंद्र एस. करंगामी, सहाय्यक प्राद्यापक,

(कृषि विस्तार शिक्षण) कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा.

कृषिपर्यटन

शेतकऱ्यांना वरदान

३८

षि पर्यटन हा अलीकडील काळात वाढत चाललेला व शेतकऱ्यांमध्ये हळूहळू लोकप्रिय ठरत चाललेला व्यवसाय आहे. सध्या शेतकऱ्यांना शेती व शेती उत्पादनाविषयी भेडसावणाऱ्या समस्यांवर या माध्यमातून एक चांगला उपाय सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येत आहेत आणि त्यापासून शेतकऱ्यांना रोजगारही उपलब्ध होऊन काही कुटुंबे आपल्या आर्थिक गरजा भागवत आहेत. कृषि पर्यटन व्यवसायाला शेती जोडधंदा म्हणून आपण व्यापक स्वरूप आणू शकतो. शेतकऱ्यांनी शेतीत चांगल्या प्रकारे नियोजन करून शाश्वत विकासाद्वारे शेती करायला पाहिजे. शेतकरी लहान मोठ्या प्रमाणात या व्यवसायात उतरत आहेत. पर्यटन हा शब्द मोठा वाटत असला तरी यातील काही बाबी आपण आपल्या शेतामध्ये व परिसरात नेहमी राबवत असतो. त्यामुळे थोडेसे प्रशिक्षण घेतले किंवा पर्यटन केंद्र प्रत्यक्ष पाहिली तर निश्चित कृषि

कृ

पर्यटन म्हणजे काय हे आपण दुसऱ्या व्यक्तींना सांगू शकतो किंवा पटवून देऊ शकतो.  शेतामध्ये फेरफटका मारताना जागोजागी पाण्याची सोय असावी. विविध फळझाडे, फुलझाडे पिके, औषधी वनस्पती लावावेत. नैसर्गिक झोपड्या, छप्पर, नैसर्गिक रचना असणारे छोटे धबधबे, दगडी रस्ते, देशी बियाणे,  औषधांचा वापर, चुलीवर जेवण,  हुरडा पार्टी, शेततळी व शेत तळ्यामध्ये मत्स्यपालन, कासवपालन,  खेकडे संवर्धन, बैलगाडी फेरफटका, रेशीम उद्योग विक्रीसाठी दुकाने, विश्रांती घेण्यास लाकडी कलाकृतीचे सोफे व सावलीसाठी तंबू व झाडाची रचना करावी. २०१७ हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर कृषि पर्यटनातून शाश्वत विकास असे संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला आहे. त्यामुळे आपल्याला खूप सुवर्णसंधी आहेत. याचा फायदा पदवीधर तसेच शेतकऱ्यांना होणार आहे. एक मोकळा श्वास किंवा कृषि पर्यटन असे सुद्धा आपण म्हणू शकतो. लोकांना शेतीबद्दल माहिती मिळू शकते.

३९

कृषि पर्यटनसाठी काय करावे?

१.  पर्यटकांना झाडांच्या सावलीत बसण्यासाठी बाकडी टाकावीत.   २. ग्रुप चर्चा करावी.  हस्तकलेच्या वस्तू प्रदर्शित करून ठेवाव्यात. ३. झाडे, पाणी, वस्तूची ओळख करून देणारे दर्शक फलक लावावेत. कुशल मार्गदर्शक नेमावेत.  ४. विहिरीमध्ये पोहण्याची सोय करावी. ठिकठिकाणी कचरा पेट्या ठेवाव्यात. पीक कापणी, पशूपालन, गोबर गॅससारख्या इंधन बचत व शेतीपूरक व्यवसायाची माहिती द्यावी. तसेच सर्व लाकडी, लोखंडी यंत्रे यांचे दर्शन घडवावे. ५. शेतकरी, कारागीर यांच्याशी पर्यटकांना गप्पा मारण्याची मोकळीक असावी. मार्गदर्शक पुस्तक व कार्यक्रम नियोजन पत्रक द्यावे. गांडूळ खताची प्रात्यक्षिके,

नर्सरी व्यवसाय प्रात्यक्षिके, विविध ग्रामीण स्वयंपाक कलेची प्रात्यक्षिके, कणसे भाजून देणे, झाडावरील नैसर्गिक दोरीने बांधलेला झोका, तुषार सिंचन, मटका सिंचन पद्धतीने झाडांना पाणी देण्याची सोय असावी.  ६. शेतातील निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांना त्यांच्या अल्पकाळ राहण्याची व्यवस्था करावी. पर्यटकांना बैलगाडी प्रवास आवडतो. त्यासाठी चांगली बैलगाडी व बैलजोडी खरेदी करावी. ७. ताजी फळे, भाजीपाला  स्वस्त दरात पर्यटकांना उपलब्ध करून द्यावा. ८. लहान मुलांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून द्यावे. ९. सेंद्रिय शेती कशी करतात, याची माहिती पर्यटकांना द्यावी.

भविष्यातील रोजगार कृषि पर्यटनामुळे  शेतकऱ्यांना तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगार मिळत आहे. जर कृषि पर्यटनात चांगले नियोजन करून त्या पर्यटन स्थळांमध्ये विविध प्रकारचे वृक्ष आपण लावले आणि शेतीसुद्धा चांगली करत असू तर नक्कीच त्या ठिकाणी कृषि पर्यटनासाठी वाव आहे. सध्या खूप ठिकाणी कृषि पर्यटन सुरू आहे. त्याठिकाणी जाऊन त्याचा अभ्यास केला तर आपण आपल्या शेतामध्ये शेतीसोबत जोडधंदा म्हणून कृषि पर्यटन सुरू करू शकतो. सध्या कृषि पर्यटनाला खूप महत्त्व आहे. शहरातील लोक सुट्ट्या घालवण्यासाठी ग्रामीण भागाकडे येतात त्यासाठी शेतामध्ये आनंददायी वातावरण म्हणजे त्या ठिकाणी विविध फुलांची झाडे असतील, त्यांच्यासाठी खाण्या पिण्याची उत्तम व्यवस्था असेल, त्यांना विविध मनोरंजक खेळ असतील तर नक्कीच कृषि पर्यटनाकडे त्यांचा ओढा वाढत जाईल. ४०

हजारो वर्षांपासून औषधी वनस्पती या रोगपरिहार, वेदनामुक्ती, सौंदर्यवर्धन इत्यादींसाठी जगभर वापरल्या जात आहेत. या वनस्पतींचे निरनिराळे भाग (जसे मूळ, खोड, पान, फुले, बिया, साल इ.) व त्यांपासून बनवलेले अर्क, काढे, रसायने, गोळ्या, लेप, तेल इत्यादी स्वरूपांत उपयोगात आणले जातात. आयुर्वेद, युनानी, निसर्गोपचार, होमिओपॅथी, ॲलोपथी, चिनी, तिबेटी, इ. सर्व औषधी पद्धतीमध्ये औषधी वनस्पतींचा वापर होतो. सुगंधी द्रव्ये व पाककृती यांतही वनस्पतींचा वापर होतो.

मोक्षदा जगदीश पाटील,

कृषी सहाय्यक, कर्मयोगी बाबारावजी जोगदंड

कृषी तंत्र विद्यालय, आमखेडा (अहिं सातीर्थ).

रोगपरिहारासह

वेदनामुक्ती देत सौंदर्यवर्धन

करणाऱ्या वनौषधी

४१

भारतात औषधी वनस्पतींच्या सुमारे २००० जाती आढळतात. त्यांपासून मिळणारे घटक मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात. खालील काही महत्त्वाच्या औषधी वनस्पती कृषी तंत्र विद्यालय, आमखेडा येथे उपलब्ध आहेत - शतावरी, काळे मिरे (काळी मिरी), हळद, आवळा, कडुनिंब, आले, गुळवेल, एरंड, कोरफड, रानतुळस, अडुळसा, बेल, एरंड, वड, पळस, आंबा,सागवान, गोकर्ण, बेहडा, अद्रक इ . वनस्पतीचे नाव वनस्पतीचा उपयोगात येणारा भाग वनस्पतीचा उपयोग १) बेल मुळ, पाने, फळ, फुले इ. ताप, आम्लता, खोकला, उष्णता इ. वर उपायकारक. उलट्या, ताप, त्वचा रोग, अस्थमा, रक्ताचे रोग, मुळव्याध इत्यादीवर उपायकारक. २) कडूनिंब पूर्ण झाड इ. ३) आवळा मूळ, साल, पाने, फळ, फुले, बी इत्यादी. जखम भरणे, उलट्या, खोकला, मूळव्याध,अस्थमा इत्यादी खोकला, ताप, उलट्या, मूळव्याध, पचनक्रिया, नाकाचे रोग, आतड्याचे रोग इत्यादी. ४) वड साल, मूळ, पाने, बी इत्यादी. ५) पळस मुळ, साल, पाने, फुले, बी, गम इत्यादी. रात्रीचा आंधळेपणा, मूळव्याध इत्यादीवर उपायकारक. ६) आंबा मूळ, पाने, फळ, फुले, बी इत्यादी. घसा रोग, खोकला, आरोग्य टोपी इत्यादी. ७) रानतुळस मूळ, पाने, फुले,बी इत्यादी. जिवाणू आणि कीटक नष्ट करते, सर्दी, पचन क्रिया इत्यादी. ८) सागवान मूळ, साल, खोड, फुले, बी इत्यादी. डोकेदुखी, आम्लता, खरूज इत्यादी. ९) शतावरी मुळ्या, अंकुर, कंद इत्यादी. कफ, पित्त, अर्धांगवायू, रक्त शुद्धीकरण इत्यादी. १०) गोकर्ण फुले, शेंगा, पाने, साल, मुळ्या इत्यादी. सर्दी, ताप, खोकला, दमा, रक्त शुद्धीकरण इत्यादी. ११) हळद हळदमधील करक्युमिन हा औषधी घटक आहे. सौंदर्य प्रसाधने, पारंपरिक कर्मकांडे, विधी, औषधे, रंग, जखम भरण्यासाठी इत्यादी. १२) बेहडा साल, फळ, बी इत्यादी. खोकला, अस्थमा, पित्त, अपचन, डोकेदुखी इत्यादी. १३) बिबा गम, फळ इत्यादी. जंत आणि ताप इत्यादी. १४) हिरडा साल आणि फळ इत्यादी. उलट्या, अस्थमा, खोकला, अपचन,जंतु, खाज इत्यादी. १५) काळीमिरी काळी मिरी दाने काळीमिरी पोटातील सूजन, पोट फुगणे, अपचन, पोटात गॅस तयार होणे आणि बद्धकोष्टता या समस्येपासून मुक्ती देते. १६) एरंड एरंडाचे सर्व भाग औषधी आहेत. सूज, जलोदर, ज्वर, दमा, कफ, आतड्यातील कृमी, मूत्ररोग यांवर उपयुक्त. १७) अद्रक पाने, फुले, कंद इत्यादी. सर्दी, खोकला, ताप, ह्रदय विकार इत्यादी. १८) गुळवेल गुळवेल ही वनस्पती आयुर्वेदात ‘अमृतकुंभ’ अशक्तपणा, कावीळ, कृमींचा त्रास, जुलाब, पोटातील मुरडा, मधुमेह, म्हणून ओळखली जाते. वाढत्या उकाड्यामध्ये मूळव्याध, संधिवात, हगवण अशा निरनिराळ्या व्याधींमध्ये गुळवेलीचा उपयोग होतो. गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते. १९) कोरफड कोरफडीच्या पानांमधील गर ताजा किंवा त्वचा, याचा गर हळद व सैंधव मिसळून सुकविलेला अनेक रोगांवर उपयुक्त आहे. घेतल्यास अपचनाचा त्रास कमी होतो. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. २०) अडुळसा. अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले सूज कमी करणारे आणि रक्त शुद्ध करणारे गुणधर्म आहेत. अडुळसा सामान्यत: दमा सर्दी आणि खोकला यासारख्या श्वसन समस्यांसाठी वापरला जातो. व फळे औषधांत वापरली जातात. ४२

संसाराची राख झालेल्या विधवेला सह्रदयी अधिकारीकर्मचाऱ्यांचा मदतीचा हात

सकीय कार्यालय, कर्मचारी म्हटले की, सामान्य लोकांच्या मनात एक तिरस्काराची भावना निर्माण होते. कारण त्यांना तसे दाहक अनुभव आलेले असतात. मात्र, सगळेच अधिकारीकर्मचारी तसे नसतात. अनेक अधिकारी स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करून नडलेल्यांच्या पाठीशी उभे राहिल्याची अनेक उदाहरणे अलीकडे आपल्या वाचण्यात येत असतात. असेच एक अनुकरणीय उदाहरण भंडारा जिल्ह्यात घडले आहे. भंडारा जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी यासंदर्भात माहिती दिली. ती त्यांच्याच शब्दात…‫آ‬ “श्रीमती फुलकवर रुपचंद कुराहे (रा. जमाकुडो) या भूमिहीन, विधवा महिलेच्या घराला दिनांक

शा

२० मार्च २०२२ रोजी अडीच वाजता अचानक आग लागून घर पूर्णतः जळाले. घरातील भांडीकुंडी, धान्य, कपडे व इतर सर्व संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. अंगावरच्या कपड्यांखेरीज काहीच उरले नाही. घराची राख तेवढी शिल्लक उरली. या महिलेचे घर जळाल्याची बातमी विविध व्हाट्स ॲप ग्रुपवर पोस्ट करण्यात आली. मदतीचे आवाहन करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत सबंध महाराष्ट्रातून २५ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मदत करण्याची तयारी दर्शविली. मदतीची सुरुवात म्हणून संबंधित महिलेला तातडीने तात्पुरते निवासस्थान उपलब्ध करून देण्यात आले. आगपीडित महिलेला केवळ

४३

अन्नधान्य, कपडे, भांडी इतकेच नव्हे तर पलंग, कुलर, गादी, भांडी ठेवण्यासाठी रॅक, कपाट, प्लास्टिकच्या खुर्च्या इत्यादी साहित्य खरेदी करून देण्यात आले. इतकेच काय, तर घराला पडदादेखील उत्साही कर्मचाऱ्यांनी लावून दिला. आगीने विस्कटलेला संसार अवघ्या २४ तासात अधिकारी-कर्मचारी यांच्या पुढाकाराने पुन्हा उभारण्यात आला. सर्वप्रथम मदत लोकसहभागातून देण्यात आली. याव्यतिरिक्त शासनाकडून मदत मिळेल, ती वेगळीच असेल. घर जळाल्यानंतर सर्वप्रथम जेव्हा मी या महिलेशी बोललो, तेव्हा ती पूर्णपणे खचून गेली होती. आता कुठे राहायचे? काय खायचे? कसे

जगायचे? असे अनेक प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाले होते. परंतु तिच्या बेचिराख संसाराला आम्ही थोडी उभारी देण्याचा प्रयत्न केन्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा या महिलेशी मी दुसऱ्यांदा बोललो तेव्हा आगीमुळे झालेल्या नुकसानीचे दुःख काहीसे कमी झाल्यासारखे वाटले. आपल्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभे आहे, याचा विश्वास त्या महिलेच्या मनात निर्माण झाल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातून एकूण २५ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. या सर्व सहृदयी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार. लवकरच या महिलेच्या घराच्या बांधकामाला देखील सुरुवात होईल.”

आपल्याला या कार्यात खारीचा वाटा उचलायचा असल्यास खालीलप्रकारे मदत करता येईल.

Name Bank name Account no IFSC code

: Fulkuwar Ruchand Kurahe : Bank of Maharashtra Salekasa : 60315384925 : MHB0000554 ४४

शेती करा, मालक बना शेती ह्या व्यवसायात कोणाचा रुबाब ऐकायची गरज नाही. टार्गेट नाही. कोणी आपले मालक नाही. कॉम्पिटिशन नाही. व्यवसाय कायम स्वरूपी. टिकाऊ. शेतात थोडे फार काम केल्यामुळे शरीर मजुबूत राहते. प्रदूषणमुक्त हवा. लॉकडाउन असले तरी पाच किलोमीटरपर्यंत शेतात फिरा. सर्व भाजीपाला, दूध आपल्याच शेतातील. घरभाडे नाही, पाणीपट्टी नाही, ग्रामीण भागातील मज्जा जरा वेगळीच आहे.

डॉ. गजानन एच. वसू ,

सहाय्यक प्राद्यापक (कृषि अभियांत्रिकी), कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा.

४५

त्यंत जबाबदारीने मी हे भाकीत करतो आहे. व्यवसाय आणि त्याचे भविष्य मी आपल्यासमोर ठेवतो. आधी तालुक्यात दोन जेसीबी होते. आता प्रत्येक गावात गल्लीत कितीतरी जेसीबी व पोकलेन आहेत. परिणामी ग्राहक कमी झाले. किंमती वाढल्या. डिझेलचा दर एवढा वाढला की, नफा कमी झाला. परिणामी धंदा बंद पडला. आधी म्हणजे अवघ्या दहा वर्षापूर्वी पेट्रोल पंप पंचवीस किलोमीटरवर होता. आता दर पाच किलोमीटरवर आहे. भविष्यात एक किलोमीटरवर राहील. रसाचे दुकान प्रत्येक लिंबाच्या झाडाखाली आहे. कापड दुकान, मोबाईल दुकान, हार्डवेअर... कुठलंही सेल्सचं दुकान घ्या. त्याचं भविष्य अंधारात आहे. कारण ऑनलाईन शॉपिंग कंपनी आज होलसेल दरात व ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत सेवा देत आहे. त्यामुळे येत्या दहा वर्षानंतर हे सर्व व्यवसाय बंद किंवा मंद अवस्थेत आपल्याला दिसतील. मात्र, शेती हा व्यवसाय कधी बंद होणारा नाही. नैसर्गिक आपत्ती आली तरी त्यातून सावरण्याची ताकद शेतकऱ्यात आहे. शेती हा उत्तम व टिकाऊ व्यवसाय आहे. त्याला जगातील कोणतीच कंपनी टक्कर देऊ शकत नाही की त्याची कुणाशी स्पर्धा नाही. गरज आहे ती शेतीकडे व्यवसाय या दृष्टीने बघण्याची. जगाच्या पाठीवरील सर्वात जास्त व्याप्ती असलेली इंडस्ट्री म्हणून बघण्याची. दृष्टी बदला म्हणजे दृष्टिकोन बदलेल.



एकर शेती घेऊ शकत नाही. शेतकरी हा उत्तम, टिकाऊ व्यवसाय आहे. भविष्यात नोकरी कोणतीच राहणार नाही. म्हणून शेतकऱ्याला महत्व येणार आहे. शेतकरी मुलाची किंमत येत्या पाच वर्षात आपल्याला कळेल. त्या वेळेस आपल्याकडे पश्चाताप शिल्लक राहील. शेती ह्या व्यवसायात कोणाचा रुबाब ऐकायची गरज नाही. टार्गेट नाही. कोणी आपले मालक नाही. कॉम्पिटिशन नाही. व्यवसाय कायम स्वरूपी. टिकाऊ. शेतात थोडे फार काम केल्यामुळे शरीर मजुबूत राहते. प्रदूषणमुक्त हवा. लॉकडाउन असले तरी पाच किलोमीटरपर्यंत शेतात फिरा. सर्व भाजीपाला, दूध आपल्याच शेतातील. घरभाडे नाही, पाणीपट्टी नाही, ग्रामीण भागातील मज्जा जरा वेगळीच आहे. सर्व गाव ओळखीचं. दररोज जेव्हा आपण जेवायला बसतो, तेव्हा अन्नाकडे बघून शेतकऱ्याला दुआ द्या. त्याच दुआवर दोन वेळेचे जेवण मिळेल. शहरामध्ये कोण शेजारी राहतात, हेही माहिती नसते. परंतु गावात दररोज रात्री पारावर लोक बसलेले असतात. शेतकरी हा परत राजा होणार आहे फक्त पाच वर्ष वेळ आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करा. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे तंत्र विकसित करा.

शेती आवडीने करा. शेती व्यवसाय म्हणून करा.

शेतकरी हा उत्तम व्यावसायिक आहे शेती हा खानदानी व्यवसाय आहे. यापूर्वी आम्हाला शिकवले जायचे की शेती व्यवसाय हा वरिष्ठ, नोकरी कनिष्ठ. आजही शेती व्यवसाय वरिष्ठच आहे. फक्त कष्ट नको म्हणून नोकरी वरिष्ठ वाटायला लागली. हेच कटू सत्य आहे. पण शेती हा व्यवसाय आता पहिल्यासारखा कष्टाचा राहिला नाही. त्यात कमालीचा बदल झाला आहे. यांत्रिकीकरणामुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. शेती हा व्यवसाय पूर्वीपासून सुरु आहे. म्हणून भारत देश कृषी प्रधान आहे. शेती व्यवसाय हा पिढ्यान पिढ्या टिकणारा आहे. आज तुम्ही करताय, उद्या तुमची मुलं करतील. तो न बंद होणारा व्यवसाय आहे. आज कोणताच शेतकरी जमीन विकायला तयार नाही. असली कोणाची विकाऊ तरी एक पण नोकरीवाला शेती विकत घेऊ शकत नाही. अगदी बारा लाख रुपये पॅकेज असेल तरी दोन

४६

उपयोगाची बातमी

कसे

तयार कराल

कंपोस्ट खत? ४७

कंपोस्ट खत म्हणजे काय? शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतामध्ये उपलब्ध असलेला काडीकचरा, पालापाचोळा, गोठ्यातील गोमूत्र इत्यादी जीवाणू कुजवून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत होय. कंपोस्ट खताचे फायदे कंपोस्ट खत शेतकरी बांधव आपल्या शेतावर तयार करू शकतात. कंपोस्ट खत निर्मितीत टाकाऊ सेंद्रीय पदार्थांचा पुनर्वापर केला जातो. कंपोस्ट खत निर्मितीसाठी फारसा खर्च येत नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे आहे.

अधिक एक कि.ग्रॅ. पीडीकेव्हीनिर्मित काडी कचरा कुजवणाऱ्या बुरशीचे मिश्रण करून मिसळावे. ढीग पद्धतीत कुजण्याची प्रक्रिया उघड्यावर होते. ही प्रक्रिया लवकर होण्याकरिता एका महिन्याच्या अंतराने ढीग वर खाली करून कुजणारे पदार्थ एकजीव करावे. ओलावा टिकविण्याकरिता अधूनमधून पाणी शिंपडावे. याशिवाय ढिगावर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकल्यास तापमानात वाढ होऊन कुजण्याची क्रिया जलद होण्यास मदत होते. ३ ते ४ महिन्यांत चांगले कंपोस्ट खत तयार होते. या खतामध्ये ०.८ ते १.५ टक्के नत्र, ०.५ ते १ टक्का स्फुरद व १ ते १.८ टक्के पालाष यासह अन्य अन्नघटक असतात.

कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रीय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून सूक्ष्म जीवांची संख्या वाढते. कंपोस्ट खताच्या वापरामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. जमिनीची धूप कमी होते. कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रीय पदार्थांचे प्रमाण वाढते. खत तयार करण्यासाठी हे हवे साहित्य शेणखत शेतातील उरलेले पीक अवषेश, काडीकचरा, शेण, तण इत्यादी. माती कुजवणारी बुरशी --------नीट समजून घ्या ही पद्धत सर्वसाधारणपणे ६ फूट रूंद व ५ ते ६ फूट उंच आणि सेंद्रीय पदार्थांच्या उपलब्धतेनुसार लांबी ठेवावी. त्यात शेतातील उरलेले पीक अवशेष, काडीकचरा, शेण, तण आदी सेंद्रीय पदार्थांचा त्यावर एक थर ठेवावा. १०० कि.ग्रॅ. शेण अधिक एक टक्के युरिया द्रावण

फ्लो चार्ट ६ फुट रूंद व ५ ते ६ फूट उंच १०० कि.ग्रॅ. ओले शेण अधिक १ टक्के युरीया द्रावण अधिक १ कि.ग्रॅ. पीडीकेव्हीनिर्मित काडी कचरा कुजवणाऱ्या बुरशीचे मिश्रण करून मिसळावे. रॉक फॉस्फेट १२० कि.ग्रॅ. स्फुरद विरघळणारे जिवाणू १ कि.ग्रॅ. डिग्री करून काळा मेनकापड किंवा गवताने झाकावे. दर एक महिन्याने थर खाली वर करून मिसळून घ्यावे. अशा रीतीने उत्तम प्रतीचे स्फुरदयुक्त कंपोस्ट खत तयार होते. ४८

हे ऐकलं त का?

भारतातलं पहिलं थ्री-डी प्रिंटे ड घर कमी खर्चात अन् अवघ्या पाच दिवसात बांधून पूर्ण

'लग्न करावं बघून आणि घर पाहावं बांधून' अशी एक म्हण आहे. घर बांधायला खूप श्रम पडतात आणि खर्चही खूप येतो, असा त्याचा अर्थ आहे. आज महागाई इतकी वाढून गेली आहे की, शेकडो कुटुंबे दोन वेळची भाकरी कशीबशी कमावत आहेत. घर वगैरे बांधणे तर दूरची गोष्ट. तरीही, आपले स्वतःचे घर असावे, अशी सुप्त

इच्छा असतेच. तथापि, सगळ्यांनाच ते शक्य होते, असे नाही. मोठ्या शहरांमध्ये तर सर्वसामान्य नागरिकांना घर घेणे किंवा स्वत:च्या जागेवर घर बांधणे दुरापास्त होत चाललं आहे. सिमेंट आणि लोखंडाचे दर गगनाला भिडले आहेत. यावर मात करण्यासाठी थ्री-डी (3D) प्रिंटेड घराचा पर्याय आला असून हे घर बांधण्यासाठी वेळ आणि

४९

घराची वैशिष्ट्ये थ्री-डी प्रिंटेड घर बांधण्यासाठी पाच ते साडेपाच लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. पैसाही कमी लागतो. असं एक घर भारतात थ्री-डी प्रिंटेड तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलं आहे. अशाप्रकारे बांधण्यात आलेले हे पहिलेच घर आहे. थ्री-डी तंत्रज्ञान हे असे एक तंत्र आहे, ज्याचा वापर करून कमी वेळेत, कमी खर्चात चांगले घर बांधता येऊ शकते. चेन्नईमधील या घराचे उद्घाटन अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे अलीकडेच केले. आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी तिव्हस्ता मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स नावाने स्टार्टअप सुरु केले आहे. या स्टार्टअपने भारतातील हे पहिले घर उभे केले आहे. ६०० चौरस फुटाचे हे घर बांधण्यासाठी फक्त पाच दिवसांचा कालावधी लागला. हेच घर पारंपरिक पद्धतीने बांधले असते तर त्यासाठी किमान १५ दिवस लागले असते. या पद्धतीच्या घरामुळे वेस्टेजही खूप कमी होते. तिव्हस्ताने हे घर बांधण्यासाठी आपले स्वत:चे

हे घर ५० ते ६० वर्षे टिकू शकते. भारतातील अवाढव्य लोकसंख्येचा विचार करता अशा पद्धतीची घरे सर्वसामान्यांना परवडणारी ठरू शकतात. कच्चा माल एका मोठ्या हॉपरमध्ये एकजीव करून अंतिम मिश्रण तयार करण्यात आले. मटेरियल विकसित केले आहे. सिमेंट, वाळू, जिओपॉलिमर आणि फायबर्सचा यात समावेश आहे. हे एक वेगळ्या प्रकारचे कॉंक्रिट आहे. यात सिमेंट पाण्याचे मिश्रणही कमी लागते.

५०

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.